शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

Lok Sabha Election 2019; भाजप बंडखोर, वंचित, प्रहारचा युतीलाच धोका अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 20:35 IST

भाजपचे बंडखोर, बसपा, प्रहार, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवारांमुळे युतीच्या उमेदवारांनाच अधिक धोका आहे, असे मत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकाँग्रेसमध्ये गटबाजी नाही, तिकिट मागणे हा सर्वांचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामुळे मतदारसंघात काँग्रेस संस्कृतीशी एकरूप असलेले मतदार आहेत. ती काँग्रेसची पारंपरिक मते आहेत. येथील जनता जातीपेक्षा विचाराला मतदान करते. त्यामुळे भाजपचे बंडखोर, बसपा, प्रहार, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवारांमुळे युतीच्या उमेदवारांनाच अधिक धोका आहे, असे मत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात सध्या सर्वच उमेदवारांमध्ये प्रचाराची चुरस निर्माण झाली आहे. याच धावपळीत ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर विश्लेषण मांडले.राज्याच्या राजकारणात २५ वर्षे घालवूनही लोकसभेच्या तिकिटासाठी संघर्ष का करावा लागला, या प्रश्नावर माणिकराव ठाकरे म्हणाले, गेल्यावेळी राहुल ठाकरे यांना ऐनवेळी तिकिट नाकारण्यात आले. मला विधानपरिषदेचे तिकिट नाकारतानाच पक्षनेतृत्वाने लोकसभेची तयारी करण्यास सांगितले होते. त्यानुसार जुलैपासूनच मी तयारी सुरू केली. उमेदवारी मागण्याचा हक्क सर्वांनाच आहे. काँग्रेसच्या पद्धतीनुसार चार टप्प्यांवरून नावे पक्षश्रेष्ठींकडे जातात, त्यातूनच एक उमेदवार ठरतो. पण अनेक जणांनी उमेदवारी मागितली यात मला काही वावगे वाटत नाही.पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करावा लागतोय का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, आमच्या पक्षात गटबाजी एवढी तीव्र नाही. अनेकांनी उमेदवारी मागितली म्हणजे ते आपले विरोधक आहे, असा त्याचा अर्थ नाही. तिकीट मागणारे असे सर्वच जण प्रचाराला लागले आहेत.या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकही आमदार नसताना आपण कशाच्या बळावर लोकसभा जिंकण्याची आशा बाळगता, यावर ठाकरे म्हणाले, ही राष्ट्रीय निवडणूक आहे. यात धोरणात्मक निर्णय घेतले जातात. सलग चार वेळा निवडूण दिलेल्या सेनेच्या खासदारांचा लोकांना मिळालेला अनुभव वाईट आहे. त्यामुळे खाली कुणाची ताकद आहे, किती आमदार आहे, यापेक्षा लोकांची भावना काय आहे, हेच महत्त्वाचे आहे.काँग्रेसच्या सत्ताकाळात कोणते मोठे काम झाले की ज्या आधारावर तुम्ही मते मागणार आहात, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था शक्य तेवढी वाढविण्याचे आम्ही प्रयत्न केले. बेंबळा प्रकल्प, मध्यम, लघु प्रकल्प, पांदण रस्त्यांची योजना, वीज बिल माफी, पोलीस कर्मचाऱ्यांची पगारवाढ, त्यांना फुल्ल ड्रेस, आधुनिक ट्रेनिंग प्रणाली, सर्कल इन्स्पेक्टरचे पद रद्द करून डीवायएसपी, अ‍ॅडीशनल एसपीच्या पदांची निर्मीती, जिल्ह्यात ३२ केव्हीचे ११ वीज उपकेंद्र, क्षमता वाढ, पारस (अकोला) येथील वीजनिर्मिती प्रकल्पाचे पुनरूज्जीवन आदी कामे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात झाली आहेत.खासदार निधी गेला तरी कुठे?शिवसेनेच्या भावना गवळी सलग चार वेळा खासदार आहेत. दरवर्षी २५ कोटी प्रमाणे किमान शंभर कोटी त्यांना खासदार फंड मिळाला. मात्र आज आम्ही एवढ्या गावात फिरताना कुठेही खासदार निधीतून झालेल्या कामाचा फलक दिसला नाही. मग खासदार निधीतील हा पैसा गेला कुठे? असा प्रश्न माणिकराव ठाकरे यांनी उपस्थित केला.वेगळा विदर्भ हाही जुमलाच२०१४ मध्ये भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर मते मागितली. मात्र आजपर्यंत वेगळा विदर्भ झाला नाही. २०१९ च्या निवडणुकीत तर विदर्भाचा मुद्दाही भाजपच्या प्रचारात दिसत नाही. त्यामुळे भाजपचे वेगळ्या विदर्भाचे आश्वासन ‘जुमला’ ठरले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019