शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

‘नाम’ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर

By admin | Published: January 11, 2017 12:31 AM

शेतकऱ्यांनी संकटाला न घाबरता परिश्रमातून शेती पिकविली पाहिजे. परिश्रम केल्यानंतर संकट आलेच तर न घाबरता त्याच्याशी दोन हात करता आले पाहजे.

मकरंद अनासपुरे : दिग्रस येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा दिग्रस : शेतकऱ्यांनी संकटाला न घाबरता परिश्रमातून शेती पिकविली पाहिजे. परिश्रम केल्यानंतर संकट आलेच तर न घाबरता त्याच्याशी दोन हात करता आले पाहजे. याउपरही आत्महत्या करण्यासारखी वेळ आली तर नाम फाऊंडेशन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेते तथा ‘नाम’ फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी येथे केले. ईश्वर देशमुख कृषी तंत्रनिकेतन आणि डेअरी टेक्नॉलॉजीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी भूषण कांतराव झरीकर, अर्चना मेहरकर, छाया राठोड, स्वप्नील देशमुख, सतीश इथापे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, विजय बंग, रवींद्र अरगडे, अ‍ॅड़ सुधाकर जाधव, प्रा. प्रेम राठोड उपस्थित होते. यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना साडी-चोळी व मदतीचे वितरण करण्यात आले. तसेच ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे डेहणी येथील रानडुकराच्या हल्ल्यात जखमी गजानन इहरे या शेतकऱ्याला १५ हजार रुपयांचा धनादेश नाम फाऊंडेशनतर्फे देण्यात आला. त्यानंतर दुर्गामाता संस्थेव्दारा संचालित शाळा व महाविद्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ११ मुलींना मोफत शिक्षण तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. ईश्वर फाऊंडेशनच्या संयोजिका वैशाली देशमुख यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या विविध खेळ व स्पर्धेतील विजेत्यांना मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते १० महिलांना मानाची पैठणी व बक्षीस देण्यात आले. संचालन कपील बोरुंदीया व गिरीश बोबडे तर आभार राजू ढोले यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)