शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
4
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
5
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
9
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
10
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
11
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
12
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
13
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
14
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
15
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
16
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
17
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
18
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
19
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
20
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

गायमुखनगर ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:46 AM

पुसद : तालुक्यातील गायमुखनगर ग्रामपंचायतीमधील गावात कोरोनाबाबत कोणतेही नियोजन नाही. गावात बाहेरून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात नाही. गावात कोरोनाबाबत ...

पुसद : तालुक्यातील गायमुखनगर ग्रामपंचायतीमधील गावात कोरोनाबाबत कोणतेही नियोजन नाही. गावात बाहेरून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात नाही. गावात कोरोनाबाबत कोणताही उपक्रम राबविला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

ग्रामपंचायतीने निर्जंतुकीकरण केले नाही. पावसाळा तोंडावर असून गावात विविध समस्या कायम आहेत. लाखो रुपये खर्च करूनसुद्धा पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळत नाही. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. समस्यांमुळे नागरिक त्रासून गेले आहेत. शासनाच्या विविध योजनांतर्गत प्राप्त निधीमधून गावात सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्याकरिता सिमेंट नाल्यांची निर्मिती करण्यात आली. परंतु, त्यातही अनियमितता आहे. नाल्यांची साफसफाई केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी नाल्याऐवजी रस्त्यावरून घरात जाण्याची शक्यता आहे.

सध्या नाल्या कचरा व घाणीने तुंबलेल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. नाल्यांची दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. संबंधित पदाधिकारी समस्यांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी नागरिकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. याबाबत नागरिक वारंवार तक्रार करीत आहेत. मात्र, ग्रामपंचायतीवर काहीच फरक पडत नाही. आता तरी समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.