शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

एसपींच्या आदेशाचे महागाव पोलिसांना वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:42 AM

अनेक गंभीर गुन्ह्यांतील तपास रेंगाळला आहे. मटका, जुगार, अवैध धंदे, गावठी दारू त्वरित बंद करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ...

अनेक गंभीर गुन्ह्यांतील तपास रेंगाळला आहे. मटका, जुगार, अवैध धंदे, गावठी दारू त्वरित बंद करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले. गंभीर गुन्ह्यातील तपास त्वरित करून आरोपीला अटक करणे, गुन्हा दोष सिद्धीचे प्रमाण वाढवणे आदी आदेश देण्यात आले. मात्र, आदेशानुसार महागाव पोलिसांची कृती दिसत नाही. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आग्रही असताना, त्यांच्या आदेशाचे मात्र पोलिसांना वावडे दिसत आहे. परिणामी नागरिकांच्या नजरेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन होत आहे.

मटका, जुगार बंद करण्याऐवजी क्लब सुरू करा म्हणून शहरात एका जमादाराने मध्यस्थांमार्फत संदेश पाठवल्याची चर्चा गावभर पसरली आहे. क्लब सुरू करण्यासाठी उत्सुकांचा शोध घेतला जात आहे. तालुक्यात आधीच मटका जुगाराचे जाळे पसरलेले आहे. मटका खावाल कोण आहे, हे सर्वश्रुत असताना, त्याच्यापर्यंत पोलिसाचे हात पोहोचले नाही. त्यामुळे शहर आणि तालुक्यातील मटका, जुगाराच्या काउंटरमध्ये कमालीची वाढ झाली आहे. १४ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची सभा झाली. त्यात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी शहरात ५४ दारू विक्रेत्यांनी कसा धुमाकूळ घातला, याचा पाढा वाचला आहे. त्या दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अभिवचन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले. मात्र, आजपर्यंत एकावरही कारवाई झाली नाही. उलट शासकीय दारू दुकान बंद झाल्यापासून किमान रोज १०० पेटी देशी दारू विविध ठिकाणांवरून अवैध मार्गाने विकल्या जात आहे.

बॉक्स

पोलिसांवरील विश्वास चालला उडत

गेल्या सात, आठ महिन्यांपासून दाखल गुन्ह्यांमध्ये महिलांवरील अत्याचार, अनुसूचित जाती, जमाती समाजातील नागरिकांवरील अत्याचाराचे गुन्हे, पोस्ट खात्यातील बचत रकमेतून खातेदाराची झालेली फसवणूक, माहूर येथील सोन्याच्या प्रकरणात झालेली फसवणूक, शहरातील अमर सकरगे मृत्यू प्रकरणात दिशाहीन तपास पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावण्यास पुरेसा आहे. सकरगे या २५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत झालेला मृत्यू स्थानिक पोलिसांनी सुरुवातीलाच आत्महत्या असल्याचा निष्कर्ष लावला होता. त्यादृष्टीने त्यांनी तपास केल्यामुळे हे संशयित प्रकरण जवळपास गुंडाळण्यात जमा आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलीस स्वतःचे कसब वापरत नसल्यामुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास उडत आहे.