शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

‘मजिप्रा’चा ना एसएमएस, ना फोन, विचारणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:17 PM

पाणी समस्येवर मात करण्यासाठी जीवन प्राधिकरण व्हॉट्सअप ग्रुप तयार करेल. त्यात पाणी सोडल्या जाणाऱ्या नगराचे नाव आणि वेळ कळविण्यात येईल, असा शब्द कार्यकारी अभियंत्यांनी पालकमंत्र्यांना बैठकीत दिला होता.

ठळक मुद्दे४० दिवसांपासून पाणी नाही : पालकमंत्र्यांच्या शब्दाला खो

रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणी समस्येवर मात करण्यासाठी जीवन प्राधिकरण व्हॉट्सअप ग्रुप तयार करेल. त्यात पाणी सोडल्या जाणाऱ्या नगराचे नाव आणि वेळ कळविण्यात येईल, असा शब्द कार्यकारी अभियंत्यांनी पालकमंत्र्यांना बैठकीत दिला होता. प्रत्यक्षात बैठक संपल्यानंतर हा कार्यक्रमही गारद झाला. काही भागात सतत चार दिवस नळ येत आहेत अन् काही भागात ४० दिवस पाणीच नाही, अशी बेभरवशाची स्थिती आहे.यवतमाळ शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असणाऱ्या प्रकल्पातला पाणीसाठा संपला आहे. फ्लोटिंग पंपच्या माध्यमातून पाण्याचा उपसा सुरू आहे. संकलित पाणी टाक्यामध्ये भरून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. कुठल्या भागात कधी पाणी सोडायचे, याचे वेळापत्रक प्राधिकरणाकडे आहे. हे वेळापत्रक नगरसेवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी पुढाकार घेतला होता. त्याची ‘अपडेट’ माहिती नगरसेवकांना दिली जाईल, अशी कबुली प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्या समक्ष दिली होती.प्रत्यक्षात बैठक संपल्यानंतर त्या दृष्टीने ग्रूप तयार झाला नाही. यामुळे कधी कुठल्या प्रभागात कुठल्या वेळी नळ येणार याची माहिती नगरसेवकांना मिळत नाही. यामुळे सर्वसामान्यांपर्यंत ती माहिती पोहोचत नाही. यातून प्रत्येक भागात स्फोटक स्थिती निर्माण झाली. पाण्यासाठी मोर्चे निघत आहे. या भागातील नागरिकांना पाणी कधी मिळेल, याचे आश्वासनही देता येत नाही. यामुळे नगरसेवकांप्रती रोष वाढत आहे.नागरिकांचे तारखांवर लक्षपालकमंत्र्यांसह काही पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यानी वारंवार अमूक तारखेपर्यंत पोहोचण्याची ग्वाही दिली होती. या तारखांकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. मात्र त्यापैकी काही तारखा उलटून गेल्या तर काही तारखा आठवडाभरावर येऊन ठेपल्यातरी शहरात पाणी पोहोचले नसल्याने नागरिकांत संताप आहे.पाणी वाटप कोलमडलेशहरात पाणी वाटपाचे वेळापत्रकच उरले नाही. जीवन प्राधिकरणाने १२ दिवसाआड पाणी देण्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात २० ते ४० दिवसात पाणी मिळत नाही. प्रत्येक भागात किती तास नळ ठेवायचे, याचेही वेळापत्रक नाही. यामुळे कुठे दिवसभर पाणी सुरू राहते. तर काही ठिकाणी दोन तासात नळ जातात. काही भागामध्ये सतत चार ते पाच दिवस नळ राहतात. तर त्याच्याच बाजूच्या नगरात ३० ते ४० दिवसांपासून पाणी नसते. असे का होते, याचे उत्तर प्राधिकरणाने अद्यापही स्पष्ट केले नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेत प्रचंड रोष आहे.