शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘मजीप्रा’ची यंत्रणा ढेपाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:22 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा कमालीची ढेपाळली आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचा बाऊ करत कामे पुढे ढकलली जात आहे.

ठळक मुद्देखापर विकास कामांवर : टंचाईतही पाणी वाहते धो धो, दुरुस्ती तकलादू

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा कमालीची ढेपाळली आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचा बाऊ करत कामे पुढे ढकलली जात आहे. शिवाय दुरुस्तीची कामे तकलादू केली जात असल्याने टंचाईच्या काळातही धो धो पाणी वाहत आहे. जागरूक नागरिकांनी केलेल्या सूचना झिडकारल्या जात आहे. पुढील काही महिन्यात शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. प्राधिकरणाच्या कामात सुधारणा न झाल्यास शहरावर मोठे जलसंकट उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.शहरात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासाठी मोठमोठ्या मशीनरीजचा वापर केला जात आहे. ही कामे करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भारत संचार निगम याशिवाय विविध खासगी कंपन्यांचे भूमिगत जाळे तुटत असल्याने सेवा विस्कळीत होत आहे. विकास कामांसाठी होणारा त्रास नागरिकांकडूनही सहन केला जात आहे. मात्र सरकारी यंत्रणेच्या चांगल्याच जीवावर येत असल्याचे काही बाबीवरून दिसून येत आहे. केलेल्या सूचनांची दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे.खोदकाम होत असलेल्या प्रत्येक भागात प्राधिकरणाची पाईपलाईन फुटत आहे. त्यातून पाणी वाहण्यासोबतच पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. काही जागरुक नागरिकांकडून याची माहिती दिल्यानंतर प्राधिकरणाच्या यंत्रणेकडून दुरुस्तीचे काम फुरसतीने हाती घेतले जाते. दुरुस्तीचे कामेही तकलादू केली जातात. दुसºया-तिसºया दिवशी झालेल्या कामाचे पितळ उघडे पडते. आर्णी रोडवर खोदकाम करताना पाईपलाईन फुटली. या भागातील लोकांनी प्राधिकरणाला सूचना केली. तत्काळ दुरुस्ती करून वाहणारे पाणी थांबविण्याची तसदी प्राधिकरणाने घेतली नाही. दुसऱ्या दिवशी डागडूजी करण्यात आली. त्याच ठिकाणी जोड तुटला. पुन्हा पाण्याची गंगा वाहणे सुरू झाले. स्टेट बँक चौकातील पाईप दुरुस्तीचा कामाला तर चक्क आठवडा लावण्यात आला. नागरिकांनी तगादा लावल्यानंतर याठिकाणची नळ दुरुस्ती करण्यात आली.कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचा बाऊमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यवतमाळ विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, हे वास्तव आहे. परंतु बहुतांश कामे कंत्राटदारांमार्फत केली जात आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या कामांवर नियंत्रण ठेवण्याइतकेही मनुष्यबळ या विभागाकडे नाही काय, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. लहान-लहान कामांसाठी कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याचा बाऊ केला जात आहे. शिवाय नागरिकांनी केलेल्या सूचनांवर अंमल करण्याचेही सौजन्य दाखविले जात नाही. ही परिस्थिती असेल तर या विभागाला आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याच गरज व्यक्त होत आहे.