शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

मराठी भाषा संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:27 PM

मराठी भाषेला दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. काळानुरुप ती बदलत गेली आहे. आपले आचार, विचार तसेच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे एक महत्वाचे माध्यम आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : मराठी भाषा गौरव दिन, जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : मराठी भाषेला दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. काळानुरुप ती बदलत गेली आहे. आपले आचार, विचार तसेच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे एक महत्वाचे माध्यम आहे. मराठी लोकाभिमुख तसेच ज्ञानभाषा होणे गरजेचे असून, तिच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन तसेच संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा खनिकर्म अधिकारी गोसावी, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. भराडी, माहिती व सूचना केंद्राचे प्रमुख राजेश देवते, संस्कार भारतीचे विदर्भ सहमहामंत्री विवेक कवठेकर, प्रदर्शनाच्या संयोजिका राजश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यामुळे आपल्या मुलांनाही मराठी भाषेतून शिकविण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही पाल्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी भाषेतून झाले, याचा मला आनंद आहे. आजच्या तरुण पिढीने दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले म्हणाले, भाषा प्रभावीपणे बदलत असते. तसेच चालिरीती आणि परंपरासुध्दा बदलतात. भाषा आणि परंपरा यांचे एक वेगळे नाते आहे. भाषेच्या समृध्दीसाठी अनेकांनी योगदान दिले असून मराठीला आणखी प्रगत करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.मराठीचा गौरव केवळ एका दिवसाकरिता नव्हे तर, नेहमी झाला पाहिजे, असे संस्कार भारतीचे विदर्भ सहमहामंत्री विवेक कवठेकर यांनी सांगितले. यावेळी अंजली सरूरकर, वेदश्री घोरकर यांनी गीत सादर केले.प्रास्ताविक निवासी उप जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी केले. संचालन प्रा. ताराचंद कंठाळे यांनी तर आभार जीवन कडू यांनी मानले.ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनजिल्हा ग्रंथालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह विनोद देशपांडे, सदस्य मनोज रणखांब उपस्थित होते.फीत कापून ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालयातील विजय मुळै, रवींद्र वानखेडे, लालसा गुल्हाने यांच्यासह ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.