शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

मारहाणीत मृत्यू, प्रेत परस्पर पुरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:15 PM

मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह परस्परच पुरल्याचा खळबळजनक प्रकार पांढरकवडा तालुक्यातील झोटींगधरा गावात उघडकीस आला.

ठळक मुद्देतक्रारीने फोडले बिंग : शवविच्छेदनासाठी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला

सुदाम दारव्हणकर ।लोकमत न्यूज नेटवर्करुंझा: मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह परस्परच पुरल्याचा खळबळजनक प्रकार पांढरकवडा तालुक्यातील झोटींगधरा गावात उघडकीस आला. शुक्रवारी पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी गावातीलच बाप-लेकांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला जाणार आहे.प्रकाश आनंदराव आत्राम (३३) रा. कोलामपोड झोटींगधरा असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर गावातीलच नंदलाला मोतीराम टेकाम (४५) व त्याची दोन मुले अंबादास (२१) आणि गोपाल (१९) यांनी २९ आॅक्टोबर रोजी प्राणघातक हल्ला केला होता. गंभीर जखमी प्रकाशला तातडीने रुंझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारानंतर डॉ.उपाध्ये यांनी प्रकाशला यवतमाळला रेफर केले. तेथे उपचार सुरू असताना ७ नोव्हेंबर रोजी प्रकाशचा मृत्यू झाला. मात्र त्याचे कोणतेही शवविच्छेदन केले गेले नाही. त्याचा मृतदेह गावाबाहेरच परस्पर जमिनीत पुरण्यात आला. दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी मृतक प्रकाशचे वडील आनंदराव आत्राम यांनी पांढरकवडा पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकरण कथन करीत फिर्याद नोंदविली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, ठाणेदार असलम खान पठाण, नायब तहसीलदार बोनगीनवार शुक्रवारी सकाळीच डॉक्टरांसह झोटींगधरा गावात पोहोचले. प्रकाशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. रुंझा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपाध्ये यांनी जागीच शवविच्छेदन केले. या प्रकरणी नंदलाल टेकाम व त्याच्या दोन मुलांविरुद्ध खून व पुरावा नष्ट करणे या कलमाखाली गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे पांढरकवडा पोलिसांनी सांगितले.या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, पांढरकवडा तालुक्यातील केळापूर येथील मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव आयोजित केला जातो. या उत्सवात प्रकाश आत्राम गेला होता. तेथे २८ आॅक्टोबर रोजी त्याचा नंदलाल टेकामसोबत वाद झाल्याचे सांगितले जाते. याच वादाचे पडसाद दुसºया दिवशी उमटले. गावात आल्यावर नंदलाल व त्याच्या दोन मुलांनी प्रकाशच्या घरी जाऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. प्रकाशच्या शरीरावरील जखमांबाबत रुंझा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘स्टॅबिंग इन्जुरी’ अर्थात भोसकल्याने झालेली जखम, असा उल्लेख आहे. सूत्रानुसार, प्रकाशवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर हे प्रकरण समेटाने मिटविण्याचे ठरले होते. मात्र ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ फिसकटल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याची चर्चा ऐकायला मिळाली.मृताच्या वडिलांनाही धमक्याफिर्याद देण्यास विलंब का असा प्रश्न सदर प्रतिनिधीने मृत प्रकाशचे वडील आनंदराव आत्राम यांना पीएम स्पॉटवर विचारला असता आपल्याला आरोपी टेकाम पिता-पुत्रांकडून धमक्या मिळाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ‘तुलाही ठार मारू’ अशा धमक्या सतत मिळत राहिल्याने आपण पोलीस ठाण्यात जाण्यास घाबरलो. शिवाय आपण मुलाच्या उपचारातही एवढे दिवस व्यस्त होतो. ७ तारखेला त्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार आटोपून आपण ९ नोव्हेंबरला हल्लेखोरांची धमकी झुगारुन फिर्याद देण्यासाठी पांढरकवडा पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे आनंदराव आत्राम यांनी सांगितले.