शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

हमीदराच्या बोलीवर व्यापाऱ्यांचा दबाव

By admin | Published: January 08, 2017 12:58 AM

तुरीच्या पडलेल्या दराला संजीवनी मिळावी म्हणून खुल्या बाजारातून हमीदराने तूर खरेदीचा अधिकार हमी केंद्रांना देण्यात आला.

शेतकरी वाऱ्यावर : खुल्या बाजारात बोलीवर प्रश्नचिन्ह यवतमाळ : तुरीच्या पडलेल्या दराला संजीवनी मिळावी म्हणून खुल्या बाजारातून हमीदराने तूर खरेदीचा अधिकार हमी केंद्रांना देण्यात आला. त्यासाठी खुल्या बाजारात बोली लावण्याचा अधिकार देण्यात आला. मात्र या अधिकारावर दबाव निर्माण करण्याची मोहीम व्यापाऱ्यांनी सुरू केली. त्यामुळे खुल्या बाजारात हमीदराने तुरीची बोली लागणार किंवा नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डाळवर्गीय पिकांचा पेरा वाढविण्याचे आवाहन सरकारने केले. मात्र या शेतमालाला चांगले दर देण्याची शाश्वती शासनाने दिली नाही. परिणामी तूर बाजारात येताच तुरीचे दर कोसळले. हे दर हमी दराच्या खाली आहेत. हमीदर आणि प्रत्यक्षात बाजारातील दर यात तब्बल १२०० रूपयांची तफावत आहे. केंद्र शासनाने तुरीला प्रती क्विंटल ५०५० रूपये हमी दर जाहीर केले. तथापि बाजारात प्रत्यक्षात ३८०० ते ४२०० रूपये क्विंटल दराने नवीन तुरीची खरेदी होत आहे. यात शेतकऱ्यांना क्विंटलमागे १२०० रूपये कमी मिळत असल्याने ते प्रचंड हादरले आहे. या स्थितीत तुरीला हमी केंद्राचाच आधार आहे. शेतकरी या केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात जाण्याची शक्यता आहे. यामुळे धास्तावलेल्या व्यापाऱ्यांनी हमी केंद्र सुरू होण्यापूर्वीच दबावतंत्र निर्माण करण्यास प्रारंभ केला आहे. तूर खरेदी करायची असेल, तर सर्वच करा, नाही तर एकाच ठिकाणी तूर खरेदी सुरू ठेवा, असा अप्रत्यक्ष निरोप त्यांनी सरकारी केंद्र चालकांपर्यंत पोहचविला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीचा अनुभव लक्षात घेता हमी केंद्र चालकांनी दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. बाजार समितीमध्ये तुरीचे खरेदी केंद्र सुरू झाले तरी ते एकाच ठिकाणी राहणार आहे. यामुळे हमी केंद्र सुरू झाले, तरी शेतकऱ्यांच्या तुरीला दर मिळण्याची शक्यता कमीच आहे. यातून व्यापाऱ्यांनाच लाभ होणार आहे. शेतकऱ्यांचे मात्र नुकसानच होणार आहे. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हमी केंद्र चलकांना संरक्षण पुरविण्याची नितांत आवशकता आहे. तरच हमी केंद्र उघडण्याचा उद्देश सफल होणार आहे. (शहर वार्ताहर) जिल्ह्यात केवळ चार केंद्र जिल्ह्यात तूर खरेदीसाठी नाफेडचे दोन आणि एफसीआयचे दोन, असे चारच हमी केंद्र सुरू झाले आहे. यवतमाळ, बाभूळगाव, राळेगाव आणि आर्णी येथे ही केंद्रे सुरू झाली आहे. उर्वरित १२ तालुक्यांमध्ये तूर खरेदी केंद्रच नाही. त्यामुळे यात्तालुक्यातील शेतकऱ्यांना तूर बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. याला आळा घालण्यासाठी १२ केंद्रावर खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.