शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

हृदयद्रावक! कर्जाचा डोंगर चढत गेला अन् आई-बाबांचे अवसानच गळाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 05:37 IST

आई-वडिलांच्या आत्महत्येनंतर मुलावर कुटुंबाची जबाबदारी, म्हणाला ‘नापिकीच्या चक्राने सर्वस्व हिरावलं’

लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ : साहेब, १ लाख १० हजार रुपये मक्त्याने शेती घेतली होती. शेतात दिवसरात्र घाम गाळला. हे पीक गेल्यानंतर दुसरे हाताला लागेल, अशी भाबडी आशा होती. मात्र, नापिकीचे चक्र सुरूच राहिले. बहिणीचे लग्न, नंतर तिचे सिझर, पुन्हा आलेले आजारपण यातून वाट काढत असताना, सोयाबीन अन् कापसाने दगा दिला. त्यातून बाहेर पडण्यासाठी हरभरा पेरला, तर रानडुकरांनी रातोरात तोही फस्त केला, अशा परिस्थितीत पुढे काय? घेतलेले कर्ज कशाने फेडायचे, अशा विवंचनेत आई-बाबा होते. 

या नापिकीच्या चक्रानेच त्यांचा बळी घेतल्याचा टाहो मुलगा निखिल याने फोडला. दिग्रस तालुक्यातील डेहणी येथे रविवारी किशोर बाळकृष्ण नाटकर (४५) आणि वनिता किशोर नाटकर (४०) या दाम्पत्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. 

आई-वडिलांसोबत शेतात राबणारा २३ वर्षीय मधला मुलगा निखिलने सोमवारी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी त्याच्या बाजूलाच मोठी बहीण निकिता (२४), लहान बहीण शारदा (१८), आजोबा बाळकृष्ण (७३) आणि आजी विमलाबाई (७०) शून्यात नजर लावून बसले होते.  

आधीच कर्ज, त्यात आजारपण...   - कुटुंबामध्ये वडील सगळ्यात मोठे होते. घरची सहा एकर कोरडवाहू शेती आणि तिला जोड म्हणून गावातीलच दहा एकर ओलिताची शेती मक्त्याने घेतली होती. - निकिताच्या लग्नासाठी दोन लाखांचे कर्ज घेतले. तिचे सिझर झाल्याने पुन्हा पैसे मोजावे लागले. आई-वडिलांनी तिच्या उपचारासाठी दीड लाखावर खर्च केला. - कापूस, सोयाबीन पिकल्यानंतर कर्जफेड होईल, अशी आशा वाटत होती. मात्र, पीक हाती आले नाही. रब्बीत दोन एकरांवर हरभरा घेतला, तर रानडुकरांनीच तो फस्त केला. यात पुन्हा कृषी केंद्राची दीड लाखाची उधारी चढली. यातून आम्ही सगळेच हवालदिल झालो होतो, अशी व्यथा निखिलने मांडली.

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरी