शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

नवरगाव मध्यम प्रकल्प तुडुंब

By admin | Published: August 01, 2016 12:51 AM

गेल्या तीन वर्षांपासून १०० टक्के न भरलेला नवरगाव मध्यम प्रकल्प हा जुलै महिन्यात पाण्याने तुडुंब भरला आहे.

नागरिकांना दिलासा : वणीकरांची वर्षभराची तहान मिटली वणी : गेल्या तीन वर्षांपासून १०० टक्के न भरलेला नवरगाव मध्यम प्रकल्प हा जुलै महिन्यात पाण्याने तुडुंब भरला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून वणीकरांची वर्षभराची तहान आता मिटली आहे. येथील नगरपरिषदेने आता स्वस्थ न बसता योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाण्याची गरज भागविण्याच्या स्पर्धेमध्ये नगरपरिषद मागे पडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वणीकरांची गरज ठरलेला नवरगाव प्रकल्प हा २७ जूलै रोजी १०० टक्के भरल्याची घोषणा पांढरकवडा पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली. या जलाशयाची पातळी २४.१० मीटर एवढी वाढली असून पाणीसाठा १२.४७ द.ल.घ.मी. एवढा झाला आहे. २७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे पाणीसाठा तपासला असता, ५ से.मी.पाण्याचा ओव्हरफ्लो सुरू दिसला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी सर्वांना १० टक्के जादा पाणी देण्याचे ठरविले आहे. यावर्षी नगरपरिषदेने ४.७० दशलक्ष घ.मी. पाणी वणीकरिता घेतले असून वणी नगरपरिषदेने ८० टक्के पाण्याची परतफेड केली आहे. १० लाख रूपयांचा शेवटचा हप्ता थकीत आहे. राखीव पाण्यासाठी आॅक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पाणी राखीव करणे गरजेचे झाले आहे. येथील नगरपरिषदेला सध्या या धरणाच्या पाण्याची गरज नसून जिल्हा परिषदेच्या पाण्यानेच काम भागणार आहे. नवरगाव धरणामध्ये यावर्षी जानेवारी महिन्यात फक्त ५१.१४ टक्के पाणीसाठा होता. वणी नगरपरिषद, मारेगाव पाणी वितरण व जिल्हा परिषद ग्रामीण पाणी वितरण या यंत्रणेकरिता हे पाणी आरक्षीत करण्यात आले होते. यामध्ये वणीसाठी २.२० द.घ.मी., मारेगाव ००.९९ तर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग १.६५ द.घ.मी. पाणी आरक्षीत होते. या तीनही यंत्रणेनी व्यवस्थीत पाणी हाताळले, तर पाणी टंचाई जाणवणार नाही, याबाबत गेल्या १३ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने लक्षात आणून दिले होते. तसेच ९ एप्रिल रोजी ‘नवरगाव धरणात फक्त २५ टक्के जलसाठा’ हे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर निर्गुडा नदीचे खोलीकरण करण्यास सुरूवात झाली व लोकसहभागातून एक महान कार्य करण्यात आले. परंतु वणीची पाणी समस्या कायमस्वरूपी केव्हा मिळणार, वर्धा नदीवरून पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी जोर लावला. परंतु त्याला फारसे यश न आल्याने वर्धा नदीचे पाणी आरक्षीत करण्यासाठी आता जागा उरली नाही. याचे कारण वरोरा जवळील पंमले पॉवर स्टेशनला भरपूर पाणी लागते. त्यामुळे त्याने आपले आरक्षण जाहीर केले आहे. वरोरा शहराची तहान मिटविण्याकरिता पाटाळा या गावाजवळ बंधारा बांधून पाणी आरक्षीत करण्यात आले आहे. आता समोर पाटाळा, गौराळा, नायगाव ही गावे आहे. त्यासमोर वेकोलीच्या कोळसा खाणी व जुनाडा घाटावर डिफेन्सने मोठा बंधारा बांधला आहे. मात्र वणी नगरपरिषद पाणी आरक्षीत करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू शकली नाही, हु दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे आता वणी शहराला नवरगाव धरणावर अवलंबून राहणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने मोठी पाईपलाईन टाकून भविष्यासाठी पाण्यावर आपला दावा आत्ताच करणे गरजेचे झाले आहे. याठिकाणी अगदी धरणाच्या मुखावर विहिर आहे. तेथे मोटार बसवून व मारेगावला जाणारी वीज तेथे असल्याने काहीच अडथळा नाही. (प्रतिनिधी) धरणापासून पाईपलाईन टाकणे गरजेचे मोठी पाईपलाईन टाकून भविष्याचे पाणी आरक्षीत करणे अत्यंत गरजेचे आहे. वणीची तहान नवरगाव धरण दूर करणार की वर्धा नदी, याचे शासनाकडून समाधान होणे आवश्यक झाले आहे. त्याकरिता वरिष्ठ नेत्यांनी शहराच्या कायमस्वरूपी समस्येवर तोडगा काढावा लागणार आहे. आता नगरपरिषदेची निवडणूक येत्या काही दिवसात होणार असून हा प्रश्न घेऊनच अनेक राजकीय पक्ष निवडणूक लढवतील. निवडून आल्यानंतर हा प्रश्न जो अनेक निवडणुकीमध्ये राजकीय मुद्दा असतो, तो तसाच राहून फक्त आपले पाच वर्ष कसे निघतात, हा मुख्य मुद्दा राहणार आहे.