शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

निळोणा आणि चापडोह धरण ७५ टक्के भरलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यवतमाळ परिसरात ३९ हजार नळ कनेक्शनधारक आहे. या नळ जोडण्यांवरून अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिक पिण्याचे पाणी भरतात. दरवर्षी प्रकल्प क्षेत्रात फेब्रुवारीपासून पाण्याचा तुटवडा भासण्यास सुरुवात होते. यावर्षी प्रकल्प क्षेत्रात ७५ टक्के पाणी आहे.

ठळक मुद्देयवतमाळकरांना खूशखबर : उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्रता कमी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत तीन वर्षांपासून यवतमाळकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी त्याच्या विरुद्ध चित्र प्रकल्प क्षेत्रात आहे. यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नसल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यवतमाळ परिसरात ३९ हजार नळ कनेक्शनधारक आहे. या नळ जोडण्यांवरून अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिक पिण्याचे पाणी भरतात. दरवर्षी प्रकल्प क्षेत्रात फेब्रुवारीपासून पाण्याचा तुटवडा भासण्यास सुरुवात होते. यावर्षी प्रकल्प क्षेत्रात ७५ टक्के पाणी आहे. यवतमाळकर नागरिकांसाठी ही जमेची बाजू आहे. यावर्षी गत तीन वर्षांप्रमाणे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, हे मात्र सत्य आहे. निळोणा प्रकल्पाची साठवण क्षमता ४.०६ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पामध्ये सध्या ३ एमएमक्यू जलसाठा शिल्लक आहे. एकूणच क्षमतेच्या ६४ टक्के पाणी निळोणा प्रकल्पात आहे. यासोबतच चापडोह प्रकल्पात ७५ टक्के पाणी शिल्लक आहे. या प्रकल्पाचे साठवण क्षमता १२.२ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रकल्पामध्ये आजच्या स्थितीत ९.०१ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. दोनही प्रकल्पांमध्ये १२ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे.हा जलसाठा १२ महिने पुरेल इतका आहे. दर महिन्याला यवतमाळकरांना १ एमएमक्यू पाणी लागते. यासोबत वेस्टेज पाणी आणि पाण्याची नासाडी लक्षात घेता आठ महिने पुरेल इतके पाणी दोन्ही जलप्रकल्पात सध्या शिल्लक आहे. आॅक्टोबर २०२० पर्यंत हे पाणी यवतमाळकरांना पुरेल, अशी संपूर्ण परिस्थिती आहे. यामुळे मार्च ते मे या कालावधीत यवतमाळमध्ये पाणीटंचाई भासणार नाही. जूनमध्ये पावसाचा विलंब झाला तरी त्याचा कुठलाही परिणाम यवतमाळकरांच्या दैनंदिन कामाजावर होणार नाही. प्रकल्पातील पाणी साठ्याची आलबेल स्थिती यावर्षी प्रथमच राहिली आहे.यवतमाळकरांना सध्या ज्या वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा होतो त्या वेळापत्रकानुसार म्हणजे चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. उन्हाळ्यातही पाण्याचे असेच वेळापत्रक राहणार आहे.यावर्षी दोन्ही प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा कायम आहे. यामुळे पुढील काळात पाणी कपातीचे धोरण राहणार नाही, मात्र यवतमाळकरांनी पाण्याचा जपून वापर करावा.- सुरेश हुंगेकार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

टॅग्स :Nilona Damनिळोणा धरणWaterपाणी