शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

रेल्वे ट्रॅकवरील शेकडो भूखंडधारकांना नोटीस

By admin | Published: February 07, 2017 1:17 AM

वर्धा-यवतमाळ-नांदेडच्या रेल्वे ट्रॅकवरील शेकडो भूखंडधारकांना भूसंपादनाची नोटीस बजावण्यात आली आहे.

वर्धा-यवतमाळ-नांदेड : वर्षभरात बांधकाम न केल्याने शेतीचे दर लावण्याची तंबी यवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेडच्या रेल्वे ट्रॅकवरील शेकडो भूखंडधारकांना भूसंपादनाची नोटीस बजावण्यात आली आहे. भूखंडावर तुम्ही वर्षभरात कोणतेही बांधकाम न केल्याने तुम्हाला मोबदला देताना शेतीचे दर का लावले जाऊ नये, अशी विचारणा या नोटीसद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे या ट्रॅकवरील भूखंडधारकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बजेटमध्ये या मार्गासाठी साडेसातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे कामाची गती आणखी वाढणार आहे. सध्या या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन केले जात आहे. या मार्गाचे यवतमाळातील रेल्वे स्टेशन आर्णी रोडवरील होमगार्ड कार्यालयाच्या मागील बाजूला होणार असल्याची माहिती आहे. या रेल्वे स्टेशनसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. त्या भागातील सुमारे आठ ले-आऊट रेल्वे भूसंपादनाच्या नकाशावर आले आहे. या ले-आऊटमधील सीमांकन तपासले जात आहे. या भूखंड मालकांना उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) रस्ते प्रकल्प यवतमाळ या कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहे. त्यात मोका पाहणीच्यावेळी भूखंडांचे सीमांकन आढळून आले नाही, अकृषक आदेशानुसार एक वर्षाच्या आत जमिनीचा अकृषक वापर करणे बंधनकारक असताना अद्याप तो केला गेला नाही, असे नमूद करीत तुम्हाला या भूखंडाच्या मोबदल्यासाठी कृषक जमिनीचे मूल्यांकन का देण्यात येऊ नये, अशी विचारणा केली गेली आहे. या नोटीस हाती पडताच भूखंडधारकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. रेल्वे स्टेशन होऊ घातलेल्या भागात ९९८ रूपये प्रति चौरस फूट दराने खरेदी झाल्या आहेत. शासनाने कृषकचा अर्थात शेतीचा भाव लावल्यास अवघा ५०० रुपये चौरस फूट दर मिळण्याची व त्याच्या पाचपट मोबदला म्हणजे अडीच हजार रुपये चौरस फूट भाव पदरी पडण्याची भीती या भूखंडधारकांना आहे. कोणत्याच भूखंडावर वर्षभरात बांधकाम करण्याचे बंधन नसताना रेल्वे ट्रॅकवरील भूखंडांसाठीच हा नियम का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आजही शहरात अकृषक परवाना मंजूर झालेले हजारो भूखंड विनाबांधकाम पडून आहेत. मात्र त्यावर महसूल खात्याने आक्षेप घेतलेला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)आधी इमारतींना परवाना, आता भूसंपादनवर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी गेल्या आठ वर्षात दहा सर्वे झाले. या काळात रेल्वे ट्रॅकच्या नकाशावर येणाऱ्या नागरिकांनी रीतसर परवानगी घेऊन बांधकामेही केली. मात्र आता या जागांचे भूसंपादन केले जात आहे. ही जागा रेल्वेसाठी हवी होती तर बांधकामाला परवानगी दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तलाठी कार्यालयाचे मध्यस्थांमार्फत संदेश ! रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासंबंधी भूखंड मालकांना नोटीस बजावण्यात आल्या. या नोटीस तलाठ्यांनी रितसर भूखंड मालकापर्यंत पोहोचविणे बंधनकारक आहे. मात्र त्याऐवजी तलाठी कार्यालय संबंधितांना मध्यस्थामार्फत संदेश पाठवून आपल्या कार्यालयातून नोटीस घेऊन जाण्यास सांगत आहे. अनेक नोटीसवर २५ जानेवारीचा उल्लेख आहे आणि सात दिवसात आपले म्हणणे मांडण्याचे संबंधिताला बजावण्यात आले आहे. मात्र या नोटीस ही मुदत संपून १२ ते १४ दिवस लोटूनही कार्यालयातच पडून आहेत. नोटीस भूखंडधारकाच्या हाती केव्हा पडली हे स्पष्टपणे लिहून देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. तलाठी साजाच्या या तुघलकी कारभाराने रेल्वे ट्रॅकवरील भूखंडधारक त्रस्त आहेत.