शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
3
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
4
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
5
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
6
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
7
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
8
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
9
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
10
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
11
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
12
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
13
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
14
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
15
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
16
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
17
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
18
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
19
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
20
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 

एक रुपयात विम्याचा दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ - कृषिमंत्री धनंजय मुंडे

By अविनाश साबापुरे | Published: August 18, 2023 6:04 PM

पुसद येथे वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कारांचे वितरण

पुसद (यवतमाळ) : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनाने पंचामृत अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील एक कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. 

पुसद येथे शुक्रवारी ‘वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कार’ सोहळ्यात ते बोलत होते. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात हा समारंभ झाला. यावेळी आमदार ॲड. निलय नाईक, आमदार इंद्रनिल नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगांवकर, माजी नगराध्यक्ष अनिता नाईक, माजी राज्यमंत्री डॅा. एन. पी. हिराणी, बाबासाहेब नाईक कापूस सूतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, माजी आमदार ख्वाजा बेग, राजेंद्र नजरधने व शेतकरी उपस्थित होते.

हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या आठवणींना उजाळा देत कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, वसंतराव नाईक यांचे कार्य अजरामर आहे. मुख्यमंत्री असताना दुष्काळासारख्या संकटांचे संधीत रुपांतर करुन त्यांनी राज्यात हरितक्रांती घडविली. त्यांनी सुरु केलेली रोजगार हमी योजना आजही सुरु आहे. राज्य शासनाचे कृषिभूषण पुरस्कार येत्या दोन महिन्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही कृषिमंत्री मुंडे यांनी दिली.

पीएम किसान योजनेंतर्गत ४५ लाख लोकांना लाभ मिळाला. ई-केवायसी, आधार लिंक, भूमिअभिलेखच्या अडचणींमुळे वंचित राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना पहिल्या टप्याचा लाभ दिला जाईल. नमो शेतकरी सन्मान योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाचे मिळून १२ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्याचा पहिला हप्ता लवकरच दिला जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना पुन्हा सुरु करणार आहोत. मागेल त्याला शेततळे, शेडनेट, ठिबक सिंचनासाठी अर्ज करणाऱ्यांना लाभ दिला जाईल. खते, बियाण्यांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी पुरस्कार दिला जातो, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे हे काम कौतुकास्पद असल्याचे मुंडे म्हणाले.

पुरस्कारार्थींची माहिती

यावेळी प्रगतीशिल शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ यांना वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात कपिल जयप्रकाश जाचक (जाचकवाडी, जि. पुणे), बजरंग सदाशिव साळुंखे (बामणी, जि. सोलापूर), विश्वास आनंदराव पाटील (लोहारा, जि. जळगाव), महेंद्र निंबा परदेशी (कुसुंबा, जि. धुळे), बाळासाहेब नारायणराव पडूळ (लाडसावंगी, जि. औरंगाबाद), अनिल तुळशीराम शेळके (कुंभेफळ, जि.औरंगाबाद), मिथिलेश हरिश्चंद्र देसाई (लांजा, जि. रत्नागिरी), संदिप बबन कांबळे (खानू, जि. रत्नागिरी), रवींद्र जयाजी गायकवाड (गायवड, जि. वाशिम), अनिल शिवलाल किरणापुरे (लवारी, जि. भंडारा), कृषी शास्त्रज्ञ प्रा. डॅा. दिगंबर मोकाट, वनस्पती विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि महिला शेतकरी सविता वैभव नालकर (चिंचविहिरे, जि. अहमदनगर) यांना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेFarmerशेतकरीYavatmalयवतमाळCrop Insuranceपीक विमा