शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

एक हजार शेतकऱ्यांची सावकारी कर्जातून मुक्तता

By admin | Published: August 01, 2016 12:49 AM

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले संपूर्ण कर्ज शासनामार्फत भरण्याचा ऐतिहासिक निर्णय २०१४च्या हिवाळी ...

सव्वा कोटींचा दिलासा : जिल्हास्तरीय समितीकडून आदेश पारित यवतमाळ : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले संपूर्ण कर्ज शासनामार्फत भरण्याचा ऐतिहासिक निर्णय २०१४च्या हिवाळी अधिवेशनात घेण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा निबंधक यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावापैकी एक कोटी १४ लाख रूपयांचे आदेश पारीत करण्यात आले आहे. यामुळे १०८७ शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊन त्यांची सावकारी कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. त्यासोबतच सावकराकडे असलेले तारणही परत मिळणार आहे. नोंदणीकृत सावकाराकडून शेतकऱ्यांनी घेतलेले संपूर्ण कर्ज आणि त्यावरील व्याज या योजनेंतर्गत सावकारास अदा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांचे सावकारांकडे असलेले तारण परत करण्यात येऊन सावकाराकडून त्यासंबंधीचे हमीपत्र सादर करावे लागत आहे. जिल्ह्यातील १०१ परवानाधारक सावकारापैकी ९१ सावकारांनी सात हजार ५७६ शेतकऱ्यांचे सहा कोटी ४१ लाख ३२ हजाराचे प्रस्ताव सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दाखल केले आहे. यापैकी तालुकास्तरीय समितीने ५० सावकारांकडील एक हजार ९३ शेतकऱ्यांचे एक कोटी १७ लाख ४ हजार रूपयांचे प्रस्ताव मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले. जिल्हास्तरीय समितीने यापैकी एक हजार ८७ सभासदांच्या एक कोटी १८ लाख २१ हजार रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली. जिल्ह्यामध्ये १ कोटी १८ लाख ४९ हजार ६४२ रुपये जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेले असले तरी शासनाकडून एक कोटी १५ लाख रुपये प्राप्त झाले आहे. त्यानुसार एक कोटी १४ लाख ७५ हजार ८८२ रूपयांचे आदेश पारीत करण्यात आले. उर्वरित कर्ज माफ करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी) तारण परत मिळणार जिल्ह्यात सावकारी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करण्यात आली असून सावकारी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांनी गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांना परत करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच सावकारांचे सहायक निबंधक यांच्याकडून कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. सुरवातीला या योजनेत सावकाराने परवाना क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यास कर्ज दिले असल्यास ते या योजनेस पात्र ठरविण्यात आले नव्हते. मात्र शासनाने ही अटही शिथिल करून सरसकट सर्वच सावकारी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाही लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होत आहे.