शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

७४ ग्रामपंचायतींसाठी केवळ ४५ ग्रामसेवक; पांढरकवडा तालुक्यात २९ जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 6:10 PM

Yavatmal : ग्रामसेवकाअभावी विकासकामांचा खोळंबा

नरेश मानकर लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : गावखेड्याचा विकास हा देश विकासाचा पाया मानला जातो; परंतु असे असतानाही केवळ ग्रामसेवकाअभावी विकासकामांचा खोळंबा होतो. गावातील अनेक विकासात्मक कामे प्रलंबित राहतात. मग प्रलंबित असलेली कामे वर्षानुवर्षे होतच नाही. परिणामी गावाचा विकास खुंटतो. अशीच परिस्थिती पांढरकवडा तालुक्यात पाहायला मिळते. आदिवासीबहुल तालुका असूनही या तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात न आल्यामुळे विकासकामे खोळंबली आहेत.

पांढरकवडा पंचायत समितीअंतर्गत ७४ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतीचा कारभार केवळ ४५ ग्रामसेवक सांभाळत आहेत. अनेक वर्षांपासून हीच स्थिती आहे. यामुळे गावाच्या विकासकामांवर परिणाम होताना दिसत आहे. पांढरकवडा हा आदिवासीबहुल तालुका आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी येतो; परंतु ग्रामसेवकाच्या रिक्त जागेमुळे अनेक गावांतील विकासात्मक कामे खोळंबली आहेत. 

बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये हे चित्र पाहावयास मिळते. ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे; परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. लोकप्रतिनिधीसुद्धा यासाठी पाठपुरावा करताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे ७४ ग्रामपंचायतींपैकी ५१ ग्रामपंचायती या 'पेसा' अंतर्गत आहेत. शासन निर्णयानुसार या ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र ग्रामसेवक असणे आवश्यक आहे; परंतु या ग्रामपंचायतींसाठीसुद्धा स्वतंत्र ग्रामसेवक नाहीत. एका ग्रामसेवकाकडे दोन-दोन, तीन-तीन ग्रामपंचायतींचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामसेवकांना काम करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. 

एका ग्रामसेवकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा प्रभार असल्यामुळे यापैकी कोणत्याच ग्रामपंचायतीचे काम धड होत नाही. बहुतांश सर्व ग्रामसेवक हे दप्तराच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळताना मासिक सभा, आमसभा व कार्यालयीन सभेला हजर राहण्यात आणि ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळण्यातच त्यांचा अधिक वेळ खर्च होतो. महत्त्वाच्या कामासाठीसुद्धा ग्रामसेवक गावकऱ्यांना मिळत नाही. मग गावकऱ्यांना ग्रामसेवक कुठे आहेत, याचा शोध घ्यावा लागतो. 

लाखोंचा निधी मिळूनही कामे अपूर्ण पांढरकवडा हा आदिवासीबहुल तालुका असल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींना विकासात्मक कामासाठी शासनातर्फे लाखो रुपयांचा निधी येतो; परंतु अनेक गावांमध्ये विकासात्मक कामे ग्रामसेवकांअभावी खोळंबली आहेत. अनेक गावांतील ग्रामस्थांनी कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्यात यावा, अशी मागणी मुख्य कार्यपालन अधिकारी, तसेच ग्रामविकास मंत्रालयाकडे केली; परंतु या मागणीकडे सतत दुर्लक्ष करण्यात येत आहे. शासनातर्फे लाखोंचा निधी मिळूनही कामे पूर्ण होऊ शकली नाहीत, याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळgram panchayatग्राम पंचायत