शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

उमरखेड तालुक्यात निष्ठावान मतदारांचा दलबदलूंना विरोध

By admin | Published: February 06, 2017 12:23 AM

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी पक्ष बदलले. आता प्रचाराच्या

जिल्हा परिषद निवडणूक : मतदार विचारत आहेत नेत्यांना जाब उमरखेड : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी पक्ष बदलले. आता प्रचाराच्या या काळात सामान्य मतदार गोंधळात दिसत असून निष्ठावान मतदार मात्र अशा दलबलूंना विरोध करताना उमरखेड तालुक्याच्या ग्रामीण भागात दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात भाजपाकडे वाढलेली गर्दी त्या पक्षाला कितपत फायदेशीर ठरेल हे नजीकच्या काळात दिसेलच. काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यात काही प्रमाणात भाजपाला यश आले आता आमचा विजयी रथ कुणी रोखू शकत नाही, असा त्या पक्षाचा गैरसमज झालेला दिसतो. जिल्ह्यात जे चित्र या पक्षाने निर्माण केले आहे. त्यात उमरखेड तालुकाही सुटला नाही. कोण कोणत्या पक्षातून त्याग करून दुसऱ्या पक्षात गेले त्यावर कार्यकर्ते नाराज दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता भोगून तृप्त झालेले आता दुसऱ्या पक्षाकडे जाताना दिसत आहे. अशा सत्तालोलूपांची भाजपाकडे गर्दी वाढलेली दिसत आहे. दोन वर्षापूर्वीच काँग्रेसची सत्ता चाखून अनेक जण भाजपाच्या वाटेवर आले होते. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीतून अनेक जण भाजपात येऊन तिकीटाचे दावे झाले आहे. अनेकांनी तर काँग्रेस, राष्ट्रवादीत संघटनात्मक पदे उपभोगली आहे. ही मंडळी आता सत्तेच्या मागे धावताना दिसत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दलबदलू नेते गावात आल्यानंतर सामान्य मतदार त्यांना जाब विचारताना दिसत आहे. निष्ठावान मतदार आपल्या नेत्याने पक्ष बदलल्याने प्रचंड नाराज झाल्याचे दिसतात. या मंडळींना जाब विचारल्यावर राजकारणात सर्वकाही चालते असेच म्हणतात. परंतु आगामी काळात निष्ठावान मतदार या दलबलूंना कसा धडा शिकवितात हे पाहणे महत्वाचे आहे. सध्या सर्वत्र पक्षांतराची लाट आली असून उमरखेड तालुकाही त्याला अपवाद नाही. परंतु आपली प्रतिमा जोपासण्यास नेते कमी पडल्याने त्यांंना दुसऱ्या पक्षाची कास धरावी लागत असल्याचे मतदारात बोलले जात आहे. (प्रतिनिधी)