शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
3
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
4
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
5
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
6
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
7
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
8
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
9
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठी शिक्षणाची संधी

By admin | Published: January 03, 2016 2:57 AM

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील अशा ५० मुलामुलींची निवड केली जाणार आहे.

भारतीय जैन संघटनेचा पुढाकार : पुणे येथे होणार शिक्षण पूर्णयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील अशा ५० मुलामुलींची निवड केली जाणार आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली जाणार असून पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात त्यांचे शिक्षण पूर्ण केले जाणार आहे. भारतीय जैन संघटना गत दोन दशकांपासून शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात कार्य करीत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्या नेतृत्वात पुणे येथील वाघोली परिसरात सुसज्ज शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे शिक्षण अर्ध्यावर थांबू नये म्हणून प्रयत्न केले जात आहे. त्याअंतर्गतच जिल्ह्यातील ५० मुलांची निवड करून त्यांना पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी, अकरावी आणि बारावीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची यासाठी निवड केली जाणार आहे. ज्या शेतकरी कुटुंबात सन २०१४ आणि २०१५ या वर्षात वडील किंवा आजोबाने आत्महत्या केली, अशा कुटुंबातील मुलामुलींची निवड केली जाणार आहे. या मुलामुलींना पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पासोबतच भारतीय जैन संघटनेचे सर्व सोयीयुक्त वसतिगृह आहे. येथे या मुलांच्या राहण्याची, जेवणाची, शैक्षणिक साहित्य, कपड्यांची, आरोग्याची तसेच मुलांच्या संपूर्ण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे, शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात आल्हाददायक वातावरणात शिक्षण पूर्ण होणार आहे. आपल्या मुलामुलींचे भविष्य उज्ज्वल करू इच्छिणाऱ्यांनी ‘लोकमत’ जिल्हा कार्यालय, पृथ्वी वंदन, गांधी चौक, यवतमाळ (०७२३२-२४३११९, २४५११९) येथे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण माहितीसह अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)