शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

...अन् माणुसकी धावून आली; निराधार सुचिताचे पार पडले शुभमंगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 20:41 IST

१०० टक्के आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यातील तान्हा पोड येथील सुचिता ही अवघी पाच वर्षांची असताना वडिलांनी कर्जबाजारीपणा आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून २००८ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच आजारी आईनेही देह त्यागला.

देवेंद्र पोल्हे, मारेगाव (यवतमाळ) : कोरोना काळात एकीकडे माणूस माणसाला टाळू लागला आहे, तर दुसरीकडे काही लोक माणुसकी अजूनही जिवंत असल्याची अनुभूती देत आहेत. असाच प्रकार तालुक्यातील तान्हा पोड या कोलाम वस्तीत आई-वडिलाविना पोरक्या असलेल्या सुचिता श्यामराव कुमरे नामक नववधूला आला. तिच्या लग्नासाठी मानवता धावून आली आणि तिचे शुभमंगल पार पडले.

१०० टक्के आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यातील तान्हा पोड येथील सुचिता ही अवघी पाच वर्षांची असताना वडिलांनी कर्जबाजारीपणा आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून २००८ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच आजारी आईनेही देह त्यागला. खेळा बागडायच्या वयातच तिच्यावर वृद्ध आजी-आजोबा आणि दोन लहानग्या भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली. स्वत:ला सावरत सुचिताने समाजासमोर आदर्श निर्माण केला. मुलगा, सून तारुण्यात गेल्याने खचलेल्या आजी-आजोबांना तिने जगण्याचं बळ दिलं. लहान भावंडांना शासकीय आश्रमशाळेत प्रवेश देऊन शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवायला लावला. यात तिचे शिक्षण मात्र मागे पडले.

भावंडं आणि आजी-आजोबा झाली. तिचे संस्कार पाहून तिला लग्नासाठी मागणी होऊ लागली, परंतु जिथे एकवेळच्या जेवणाची भ्रांत होती, तिथे लग्नसोहळा कसा करणार,  हा प्रश्न गावासह सुचिताला ही भेडसावू लागला. गावातील काही लोकांनी ही बाब पंचायत समिती सदस्य सुनीता लालसरे व त्यांच्या पतीच्या कानावर घातली. त्यांनी गावकऱ्यांशी विचारविनिमय करून सुचिताची केळापूर तालुक्यातील खैरी येथील सुरेश रघूजी आत्राम  नामक तरुणाशी विवाहगाठ बांधली. लग्न सोहळ्याचा बराचसा खर्च लालसरे दांपत्याने उचलला. मोठ्या आनंदात मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत लग्न पार पडले. २१ मे रोजी ती विवाह बंधनात अडकून पतीसोबत सासरला निघून गेली. त्यावेळेस अवघ्या गावाच्या डोळ्यात आसवे तर‌ळली.

टॅग्स :marriageलग्न