शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
2
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
3
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
4
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
5
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
6
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
7
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
9
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
10
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
11
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
12
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
13
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
14
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
15
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
16
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
17
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
18
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
19
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
20
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर

सोनदाभीत लोकसहभागातून पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:25 PM

उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील सोनदाभी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. व्याकूळ झालेल्या या गावातील नागरिकांनीच आपला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.

ठळक मुद्देगावकऱ्यांना दिलासा : पाणी फाऊंडेशनची प्रेरणा, एक किमीवरून आणले पाणी

ऑनलाईन लोकमतढाणकी : उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील सोनदाभी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. व्याकूळ झालेल्या या गावातील नागरिकांनीच आपला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. श्रमदान व लोकसहभागातून एक किलोमीटर अंतरावरील विहिरीत पाणी गावात आणले आणि पाणी समस्या मिटविली. यासाठी त्यांना पाणी फाऊंडेशनने सहकार्य केले.सोनदाभी येथे बंदी भागातील दुर्गम गाव. पाणीपुरवठ्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने गतवर्षी विहिरीचे खोदकाम केले. विहिरीला पाणीसुद्धा लागले. परंतु विहीर गावापासून एक किलोमीटर दूर आहे. त्यातच पाईपलाईनचे काम पूर्ण झाले नाही. आडात आहे, पण पोहºयात नाही, अशी अवस्था येथील गावकऱ्यांची झाली होती. उन्हात एक किलोमीटरवरून पाणी आणणे शक्य नव्हते. त्यामुळे गावकरी तहानेने व्याकूळ झाले होते.शासनाची प्रतीक्षा न करता गावकºयांनीच पाणी प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. पाणी फाऊंडेशनचे संतोष गवळे, चिंतामणी पवार, मनीष मालोकार, मधुकर लिंगदे यांनी गावकºयांशी चर्चा केली. जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. त्यांनी मदतीची आश्वासन दिले. पाणी फाऊंडेशनने गावकऱ्यांसमोर श्रमदान व लोकसहभागाची संकल्पना मांडली. भगवानसिंग साबळे, मारोती पिलवंड, अशोक घोगेवाड, नूरसिंग साबळे, देवानंद वाढेकर, युवराज साबळे, नानकसिंग बस्सी, अज्ञानसिंग जोडवे, काशीराम साबळे, शिवाजी काळबांडे, चंद्रसिंग पडवाळे यांनी पुढाकार घेऊन गावातील लोकांकडून पाईप जमा केले. श्रमदानातून पाईप टाकून विहिरीतील पाणी गावापर्यंत पोहोचले आणि पाणीटंचाईवर मात केली.गावकऱ्यांचे परिश्रमसोनदाभी येथील गावकऱ्यांनी श्रमदान केल्यामुळे गावाला आज मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. प्रशासनाची प्रतीक्षा करीत बसले असते तर गावकऱ्यांना उन्हाळ्यात पाणीही मिळाले नसते. गावकऱ्यांच्या परिश्रमाचे चीज झाल्याचे समाधान आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.