शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाच भाविकांच्या निधनाने पंचक्रोशी गहिवरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:06 IST

राळेगाव तालुक्यातील रिधोरा या छोट्याशा गावाने पाच भाविकमनाचे गावकरी अपघातात गमावले. देवदर्शनाला जाताना कुणाला काहीही कल्पना नसताना अचानक मृत्यूने गाठले. मृतकांवर शनिवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देशोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार : रिधोरा गावातील एकाही घरात चूल पेटली नाही

मंगेश चवरडोल ।लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : राळेगाव तालुक्यातील रिधोरा या छोट्याशा गावाने पाच भाविकमनाचे गावकरी अपघातात गमावले. देवदर्शनाला जाताना कुणाला काहीही कल्पना नसताना अचानक मृत्यूने गाठले. मृतकांवर शनिवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेमुळे संपूर्ण वडकी पंचक्रोशी गहिवरली असून गावात एकाही घरात चूल पेटली नाही.वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगाव फाट्याजवळ शुक्रवारी हा भीषण अपघात घडला. रिधोरा गावातील काही महिला वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी वर्धा जिल्ह्यातील आजनसराकडे निघाल्या होत्या. भोजाजी महाराज देवस्थानात दर्शन घेऊन वाढदिवस करण्यासाठी हा जत्था निघाला होता. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील कारेगाव फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. समोरून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या आॅटोरिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास १५ जण गंभीर जखमी झाले.मृतांपैकी येनुबाई जुमनाके यांच्या पार्थिवावर शुक्रवारीच रात्री ११ वाजता अंत्यविधी करण्यात आला. तर अरविंद बोरुले, संगीता बोरुले, उमाबाई शेंडे, जया लोनबले यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंत्यविधी करण्यात आला. यावेळी तालुक्यातील अनेक राजकीय पुढाऱ्यांसह परिसरातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती. या दुखद घटनेची वार्ता पसरताच पंचक्रोशीत शोककळा पसरली.जखमींच्या उपचारासाठी लोकवर्गणीया भीषण अपघातात जखमी झालेल्यांपैकी काही जणांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा कठीण प्रसंगी गावकरीच मदतीला धावून आले. गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.चिमुकल्यांचा आक्रोशया भीषण अपघातामुळे ललित अरविंद बोरुले आणि वेदिका अरविंद बोरुले हे बहीण-भाऊ पोरके झाले आहेत. त्यांचे आईवडील अपघातात मृत्यू पावले. अंत्यसंस्कारावेळी या चिमुकल्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू