शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

‘इन्टेलिजन्स’च्या धर्तीवर पोलिसांना १३ महिन्यांचा पगार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 11:28 IST

पोलीस दलाला ‘इन्टेलिजन्स’च्या धर्तीवर एक महिन्याचा अतिरिक्त पगार अर्थात १३ महिन्यांचा पगार द्या, ही मागणी पुढे आली आहे.

ठळक मुद्देगृहमंत्रालयाला साकडेकिमान साप्ताहिक सुटीही नियमित मिळत नसल्याची खंत

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सरकारने शासकीय कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा केल्याने तमाम अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना पोलीस दलातून मात्र ‘आम्हाला किमान साप्ताहिक सुटीही नियमित मिळत नाही हो’ अशी खंत व्यक्त केली जात आहे. त्यावर पर्याय म्हणून ‘इन्टेलिजन्स’च्या धर्तीवर एक महिन्याचा अतिरिक्त पगार अर्थात १३ महिन्यांचा पगार द्या, ही मागणी पुढे आली आहे.अत्यावश्यक सेवा म्हणून पोलीस दलाला पाच दिवसांचा आठवडा लागू केला जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणतीही संघटना नसलेल्या पोलिसांनी खासगीत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. पोलिसांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या व्यथा व मागण्या गृहमंत्रालयापर्यंत पोहोचविल्या जात आहेत.सुट्या कमी मिळत असल्याने केंद्र शासन ‘इन्टेलिजन्स ब्युरो’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना १३ महिन्यांचा पगार देते. हाच पॅटर्न अलिकडेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनाही लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही अतिरिक्त कामाचा मोबदला म्हणून वर्षाला १२ ऐवजी १३ महिन्यांचा पगार देण्याची मागणी पुढे आली आहे.

कमी मनुष्यबळ व सततचा बंदोबस्तपोलीस नियमित १२ ते १४ तास काम करतात. अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत प्रत्येक आठवड्याला ते एक दिवस जास्त काम करतात. त्यांना आठवडी सुटी लागू असली तरी कमी मनुष्यबळ व सततचा बंदोबस्त यामुळे ही सुटी नियमित मिळेलच याची हमी नसते. शाळा-महाविद्यालयांनाही पाच दिवस आठवडा लागू नसला तरी त्यांना उन्हाळ्यात दोन महिने आणि दिवाळीत २१ दिवस सुट्या मिळतात. केवळ पोलिसांचाच या सुट्यांना अपवाद आहे.सव्वालाख पोलिसांवर राज्याचा कारभारमहाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे १८६ पोलीस उपलब्ध होतात. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार प्रत्यक्षात ३०० पोलिसांची आवश्यकता आहे. राज्यात पोलिसांच्या दोन लाख २० हजार जागा मंजूर असल्या तरी त्यापैकी केवळ एक लाख ९८ हजार पोलीस तैनात आहे. त्यातील ३० टक्के अर्थात सुमारे ६० हजार पोलीस ‘फायटींग फोर्स’मध्ये नाहीत. त्यांच्याकडे स्कॉटींग, वायलेस ड्युटी, गार्ड, बंगले व व्हीआयपी सुरक्षा यासारखी ‘साईड’ची जबाबदारी आहे. पोलीस शिपाई ते उपअधीक्षक या श्रेणीतील २२ हजार जागाही रिक्त आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष ‘पोलिसींग ड्युटी’ला अवघे एक लाख ३० हजार पोलीस उपलब्ध होतात. त्यांच्या भरोश्यावर संपूर्ण महाराष्ट्राची सुरक्षा सांभाळली जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस