शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

‘मेडिकल’चा बालरुग्ण विभाग वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 11:26 PM

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरुग्ण विभागात मोठी अनागोंदी सुरू आहे. कनिष्ठ डॉक्टरांच्या भरवशावरच इथला कारभार आहे. त्यातही बोटावर मोजण्याइतकेच डॉक्टर येथे प्रामाणिकपणे सेवा देतात.

ठळक मुद्देअसभ्य वर्तणूक : बालमृत्यूचे प्रमाणही वाढले, कनिष्ठ डॉक्टरांवरच भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरुग्ण विभागात मोठी अनागोंदी सुरू आहे. कनिष्ठ डॉक्टरांच्या भरवशावरच इथला कारभार आहे. त्यातही बोटावर मोजण्याइतकेच डॉक्टर येथे प्रामाणिकपणे सेवा देतात. बाकीचे आलेल्या रुग्णांना असभ्य भाषेत बोलून येथून हुसकावून लावण्याचाच प्रयत्न करत आहे. यामुळे याठिकाणी बालमृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येते.बाल रुग्ण विभागात शनिवारी पहाटे अकबर वसीम खान (वय २ वर्षे) रा.नबाबपूरा कळंब चौक या बालकाचा मृत्यू झाला. हा बालक आठ दिवसांपासून येथे उपचार घेत होता. रात्री अचानक तो मोठ्याने खोकलायला लागला. मात्र यावेळी वॉर्डात कोणीच उपलब्ध नव्हते. धावपळ करून डॉक्टरांना बोलाविण्यात आले. इन्चार्ज नर्स खोली कुलुपबंद करून झोपी गेली. त्यामुळे काही वेळ आलेल्या डॉक्टरची तारांबळ झाली. शेवटी नर्सला उठवून चाबी घेत औषधांचा साठा असलेली खोली उघडण्यात आली. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या विभागात मागील काही दिवसांपासून अनागोंदी असून केवळ कनिष्ठ डॉक्टरांवरच उपचाराची यंत्रणा अवलंबून आहे. सलमा शेख (२०) रा.सावनेर ही महिला आपल्या मुलीला घेऊन शुक्रवारी रात्री ११ वाजता रुग्णालयात आली. बाल रुग्ण विभागात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने असभ्य शब्दांचा वापर करत एवढ्या रात्री कशाला आली म्हणून हेळसांड केली. ही आपबीती सलमा शेख या महिलेने सांगितली. याशिवाय अंकुश प्रभूसिंग पवार हा मागील ११ दिवसांपासून आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात आहे. मोईन शेख, सैयद असलीम सैयद अलीना (रा.कळंब), जयश्री राठोड (रा.कोसदनी), शे. सुफियाना शे. फारूख (रा.डेहनकर ले-आऊट) या मुलांच्या पालकांनाही बाल रोग विभागात अतिशय कटू अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.बाल रोग विभागात रुग्ण दाखल झाल्यानंतर तो स्वत:हून कसा पळून जाईल, अशी व्यवस्था येथील यंत्रणेकडून निर्माण करण्यात आली. अर्थात या विभागात काही कर्तव्यदक्ष व मनमिळाऊ डॉक्टर आणि नर्सचाही स्टाफ असल्याचे सांगण्यात आले. मात्र यांच्या मर्यादा येत असून कामचुकारांकडून सातत्याने हेळसांडच केली जाते. आर्थिक परिस्थिती नसल्याने शासकीय रुग्णालयात येण्याशिवाय पर्याय नाही. अनेक दाम्पत्य रोजमजुरी सोडून १०-१५ दिवसांपासून मुलाजवळ आहे. अशास्थितीत घरी असलेल्या मुलांचा उदरनिर्वाह आणि उपचारासाठीचा पैसा कोठून आणायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. येथे डॉक्टर उडवाउडवी करून केवळ वेळ मारून नेत असल्याचे सांगण्यात आले.शासकीय रुग्णालयात सहज दृष्टीपथास येईल असे फेरबदल प्रभारी अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार यांनी केले आहे. मात्र रुग्णालयातील अंतर्गत यंत्रणा अजूनही सुस्तावलेलीच आहे. वरकरणीचा भपकेबाजपणा कमी करून खºया अर्थाने रुग्णांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे.