शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

खूनसत्रावर उपचाराची नस पोलिसांना सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:27 IST

शांत शहर म्हणून ओळख असलेल्या यवतमाळात दर आठवड्याला खुनाची घटना घडत आहे. दिवसाढवळ्या खून होत आहे. जानेवारीपासून चार महिन्यात एक-दोन नव्हे तब्बल १४ खून झाले. आरोपी पोलिसांच्या हातीही लागत आहे.

ठळक मुद्देचार महिन्यात १४ खून : नवख्यांची मानसिकता ओळखण्यात अपयश

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शांत शहर म्हणून ओळख असलेल्या यवतमाळात दर आठवड्याला खुनाची घटना घडत आहे. दिवसाढवळ्या खून होत आहे. जानेवारीपासून चार महिन्यात एक-दोन नव्हे तब्बल १४ खून झाले. आरोपी पोलिसांच्या हातीही लागत आहे. मात्र खुनाचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. पोलीस यंत्रणेच्या अनेक मर्यादा या खून सत्राने उघड झाल्या. प्रत्येक खुनात नवीनच आरोपी असतात. नवख्या आरोपींची मानसिकता ओळखण्यात अपयश आल्याने पोलिसांना उपचाराची नसही सापडत नाही.यवतमाळ शहराची ओळख गुन्हेगारांचे शहर अशी होऊ लागली आहे. येथील गुन्हेगारीचा प्रश्न थेट विधिमंडळातही गाजला. शहरात खुनाचे सत्र सुरू आहे. एकट्या यवतमाळ शहरात जानेवारी ते २५ एप्रिलपर्यंत तब्बल १४ खून झाले. भर रस्त्यात, वर्दळीच्या ठिकाणी खुनाच्या घटना घडत आहे. या खुनांमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक दहशतीत आले आहे. खून झाला की पोलीस आरोपींना तातडीने अटक करतात. पुढची कारवाई होते. परंतू खुनाचे सत्र थांबविण्यासाठी पोलिसांकडे कोणतेच नियोजन दिसत नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगार नाही म्हणून पोलीस हात वर करतात. नवघ्याना कसे ओळखायचे, कुणाचे कोणाशी वैर आहे याची माहिती मिळणे शक्य नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या घटना सातत्याने वाढत आहे.शहरात घडलेल्या प्रत्येक खुनामागील कारणांची मिमांसा केली तर त्यात वेगवेगळी कारणे आढळून येतात. सावकारीपासून भाईगिरीपर्यंत सर्वच कारणांचा यात समावेश आहे. अल्पवयीन आणि नवयुवकही दिवसाढवळ्या खून करण्यात मागे नाही. यवतमाळ शहरातील गुन्हेगारीवर वचक आणण्यासाठी पोलिसांचे योग्य नियोजनच दिसत नाही. विधिमंडळात गुन्हेगारीची मुद्दा गाजल्यानंतर पोलीस रस्त्यावर उतरले.काही दिवस वाहनधारकांची तपासणी केली. मात्र आता ही मोहिमही थंड बस्त्यात पडली आहे. खून होताच मात्र आरोपींनाही अटक करतोच की असे अफलातून उत्तर दिले जाते. पोलीस ठाण्यामध्ये अनेक वर्षापासून मुक्कामी कर्मचारी आहे. त्यांना प्रत्येक हालचालीची माहिती सुद्धा मिळते. परंतु कारवाई करण्याची मानसिकता नाही. केवळ आपले पद कायम ठेवण्यासाठी तजविज केली जाते. याला बाहेरुन आलेल्या अधिकाऱ्यांनाही भक्कम साथ दिली जाते. जमादाराकडे बीट सोपविण्यात येते. त्यावर अधिकाºयाचे नियंत्रण असते. परंतू प्रत्यक्षात कोणाचे लक्ष दिसत नाही. दिलेला कार्यक्रम राबवून सोपस्कार पूर्ण करण्याची मानसिकता झाली आहे. याच कारणामुळे खुनाच्या सत्रावर उपचाराची नस पोलिसांच्या हाती सापडत नाही.नव्या आकृतीबंधाची गरजशहर पोलीस ठाण्यानंतर अवधूत वाडी ठाणे तयार झाले. त्यानंतर लोहारा ठाण्याचीही निर्मिती झाली. मात्र येथे पुरेसा अधिकारी-कर्मचारी वर्ग नाही. शहराची लोकसंख्या अडीच लाखाच्या घरात आहे. त्या तुलनेत पोलीस अधिकारी, कर्मचारी नाही. मंजूर असलेला आकृतीबंध हा १५ वर्षापूर्वीचा आहे. त्यातही अनेक पदे रिक्त आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची गरज आहे. राजकीय मानसिकता नसल्याने नवीन आकृतीबंध तयार होत नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा