शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

दारव्हा येथे वीज कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:30 AM

दारव्हा : राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कर्मचारी यांच्या संयुक्त कृती समितीतर्फे ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. ...

दारव्हा : राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कर्मचारी यांच्या संयुक्त कृती समितीतर्फे ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. येथेही २४ मे पासून आंदोलन सुरू आहे.

तालुक्यातील वीज कंपन्यांतील संयुक्त कृती समितीतर्फे ‘काम बंद’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलकांनी वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार व सुरक्षारक्षक यांना फ्रंटलाईन कामगाराचा दर्जा देउन राज्य शासनाप्रमाणे फ्रंटलाईन वर्करच्या सर्व सुविधा देण्याची मुख्य मागणी केली आहे. याशिवाय वीज कंपन्यांतील सर्व कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार, सर्व सहायक व सुरक्षारक्षक यांचे व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, कोरोनामुळे मृत पावलेल्यांना राज्य शासनाप्रमाणे ५० लाखांचे अनुदान द्यावे, मेडिक्लेम पाॅलिसीमधील बदललेले टिपीए तत्काळ रद्द करुन जुने टिपीए एमडी इंडियाची ताबडतोब नेमणूक करावी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, बिल वसुलीकरिता सक्ती करू नये, या प्रमुख मागण्या केल्या आहेत.

२४ मे पासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा कोविड सेंटर, क्वारंटाईन सेंटर अथवा कोरोना रुग्ण व इतर कुठल्याच अत्यावश्यक सेवेला फटका बसणार नाही, याची वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांनी विशेष खबरदारी घेतली आहे. येथील आंदोलनात संयुक्त कृती समितीतील वर्कर्स फेडरेशन संघटनेतर्फे विभागीय अध्यक्ष सुधीर राठोड, शाखा सचिव अक्षय आरू, चंद्रकांत धार्मिक, संतोष मंदाडे, मिलिंद सावंत, घनश्याम खोपडकर, नितीन राठोड, नरेश तिराणकर, प्रणीता वाकडे, प्रणित शिरे, उमेश भगत यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदविला.