शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

ंधान्य व्यापाऱ्यांपुढे लोकप्रतिनिधी हतबल

By admin | Published: April 10, 2017 1:45 AM

येथील व्यापाऱ्यांनी स्वत:चेच इलेक्ट्रॉनिक्स काटे वापरण्याचा वाद उपस्थित करून बाजार समितीतील शेतमाल खरेदी ठप्प पाडली.

उसंत मिळेना : १५ दिवसांपासून व्यवहार ठप्पयवतमाळ : येथील व्यापाऱ्यांनी स्वत:चेच इलेक्ट्रॉनिक्स काटे वापरण्याचा वाद उपस्थित करून बाजार समितीतील शेतमाल खरेदी ठप्प पाडली. खरेदी सुरू करण्यासाठी बाजार समिती विनंती करीत असताना व्यापाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यापुढे लोकप्रतिनिधी हतबल झाल्याचे दिसत आहे. व्यापारी कमी दराने शेतमाल खरेदी करीत असून प्रशासनलाही जुमानत नाही. या मनमानी कारभाराने येथील बाजार समिती गेल्या १५ दिवसांपासून ठप्प आहे. तरीही लोकप्रतिनीधी व्यापाऱ्यांवर दबाव आणत नाही. उलट त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांनी लूट चालविली आहे. मात्र लोकप्रतिनिधी, शेतकरी नेते आणि विविध संघटना डोळ्यांवर पट्टी बांधून आहे. सोयाबीन, तूर, हरभरा आणि गहू विकण्यासाठी बाजार समितीत दररोज शेतकरी येरझारा घालत आहे. मात्र त्यांना स्थानिक व्यापारी आणि दलाल सध्या थांबा, असे सांगत आहे. यामुळे शेतकरी गावातच वाट्टेल त्या भावात शेतमाल विकत आहे. यातही लहान व्यापारी त्यांची लूट करीत आहे. गेल्या १५ दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. सर्व लोकप्रतिनिधी मूग गिळून असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.या संपूर्ण प्रकाराची माहिती लोकप्रतिनिधींना आहे. मात्र त्यांनी ही कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला नाही. यामुळे त्यांचे या प्रकाराला पाठबळ तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. यापूर्वी जिल्ह्यातील सर्वच मोठ्या लोकप्रतिनिधींनी प्रथम नगरपरिषद, नंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले होते. या संपूर्ण कार्यकाळात शासकीय तूर खरेदी केंद्र आणि बाजार समितीचा बंद होता. त्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. (शहर वार्ताहर) सीसी मिळविण्यासाठी व्यापारी म्हणून नोंदसध्या यवतमाळ बाजार समितीत नोंदणीकृत व्यापाऱ्यांचा आकडा ६० च्यावर पोहोचला आहे. प्रत्यक्षात शेतमालाची खरेदी करणारे केवळ १६ व्यापारी असल्याची माहिती आहे. उर्वरित व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्याच्या नावावर केवळ बँकेकडून लाखो रूपयांची सीसी वाढवून घेण्यासाठीच व्यापारी म्हणून नोंद केल्याचे स्पष्ट होत आहे. संबंधित बँकेकडून शेतकऱ्यांच्या नावावर मिळालेल्या सीसीच्या पैशांचा वापर इतर व्यवहारात केला जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.