शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

तलाठी-कृषी विभागाच्या वादात थांबल्या याद्या; ११ लाख शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

By रूपेश उत्तरवार | Published: October 03, 2022 10:31 AM

तलाठी आणि कृषी विभागाच्या यंत्रणेत इंग्रजी यादी तयार करण्याचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

यवतमाळ : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यासाठीची भरपाई प्रत्येक जिल्ह्याकडे वळती झाली. मात्र, मदत वाटपाचा निधी जमा करण्यासाठी ११ लाख शेतकऱ्यांच्या नावाची यादीच यंत्रणेकडे नाही. तलाठी आणि कृषी विभागाच्या यंत्रणेत इंग्रजी यादी तयार करण्याचा वाद २० दिवसांपासून सुरू आहे. दसरा तोंडावर आला, मात्र वाद सुटला नाही. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, अकोेला, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. जवळपास २० लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागात तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर आदेश निघाले. निधी वळता झाल्यानंतर मदतीच्या याद्या तयार करायच्या कोणी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नुकसानीचे ग्रामस्तरीय समितीने संयुक्त पंचनामे केले. याद्या तयार करण्याचे काम तलाठ्यांवर ढकलण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याद्या करण्याचे मूळ काम कृषी विभागाचे आहे. तसा अध्यादेशही आहे. मात्र काम तलाठ्यावर ढकलण्यात आले आहे. त्यांनी इंग्रजी याद्या तयार करण्यास नकार दिला आहे. शेतात पीक नाही, हातात मदतीचा छदाम नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. संकटावर मात करण्याचा आधारही त्यांना मिळालेला नाही.

ग्रामस्तरीय समितीकडे काम द्या

ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहायकांनी मिळून नुकसानीचे पंचनामे केले आहे. आता याद्यांचे काम संयुक्त समितीकडे द्यावे अथवा कृषी विभागानेच काम करावे, अशी भूमिका तलाठ्यांनी घेतली आहे. याशिवाय ०.२५ टक्के खर्च निधी तलाठ्यांना देण्याची मागणी करण्यात आली. यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.

१२ सप्टेंबरपासून संप सुरू आहे. त्यावर तोडगा निघाला नाही. आयुक्तस्तरावर चर्चेेला बोलावले आहे. कृषी विभागाचे काम आमच्यावर थोपवू नये, अशीच भूमिका आहे.

- बाळकृष्ण गाढवे, अध्यक्ष, विभागीय पटवारी संघटना.

जिल्हा - संपावर असलेले तलाठी - कोंडीत सापडलेले शेतकरी

  • यवतमाळ - ६४९ - ३,७५,०००
  • अमरावती - ५३१- २,००,०००
  • अकोला - ३१९- ७६,०२३
  • वाशिम - २८८ - २०,०००
  • बुलडाणा - ५३९ - ५,०००
  • नागपूर- ३३४- १,१४,०००
  • वर्धा -२९१-१,७३,०००
  • भंडारा- २०४-१२,०००
  • गोंदिया -२०३-१,०००
  • चंद्रपूर -३०२-१,५९,०००
  • गडचिरोली -२३७-२५,०००
टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी