शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

दलित वस्तीसाठी तीन नवीन टाक्या प्रस्तावित

By admin | Published: May 30, 2016 12:04 AM

शहरातील जुन्या वस्तीला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे राजारामनगर, पाटीपुरा, गौतमनगर परिसरातील नागरिकांना बारमाही पाणी टंचाई सोसावी लागते.

 ७० लाखांचा निधी : राजारामनगर, गौतमनगर, पाटीपुराचा प्रश्न सुटणारयवतमाळ : शहरातील जुन्या वस्तीला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे राजारामनगर, पाटीपुरा, गौतमनगर परिसरातील नागरिकांना बारमाही पाणी टंचाई सोसावी लागते. या भागाला योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी दलित वस्तीच्या निधीतून तीन टाक्या बांधण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यावर ७० लाख ८५ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. राजारामनगर, अंबिकानगर या परिसरासाठी कपिल वस्तूनगरातील खुल्या जागेत २३ लाख रुपये खर्चून टाकी बांधण्यात येणार आहे. याचप्रमाणे गौतमनगर, तलावफैल भागासाठी वंजारी फैलामध्ये खुल्या जागेत २३ लाखांची पाण्याची टाकी बांधली जाणार आहे. पाटीपुरा, सेवानगर परिसरासाठी नागपूर मार्गावर असलेल्या जीवन प्राधिकरणाच्या जागेत पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागास वस्त्यांमधील पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी माजी बांधकाम सभापती प्रणिता खडसे आणि भाजपाचे शहराध्यक्ष विजय खडसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रस्तावाला नगरपरिषदेच्या ८ आॅगस्ट २०१४ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली. हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आला. पाणीपुरवठा टाकीची आवश्यकता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा विषय १८ मे रोजी नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आता तिन्ही टाक्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रणिता खडसे यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)