शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
2
रेल्वे स्थानकावर मनोविकृताचा हल्ला, दोघांचा मृत्यू, दोन जखमी
3
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
4
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
5
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
6
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
7
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
8
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
9
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअड धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
10
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
11
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
12
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
13
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
14
पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये कोळसा खाणीत भीषण स्फोट; ७ मजुरांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
भोजपुरी सिनेमा, पवार कुटुंबाशी नातं, किल्ल्यांची दुरवस्था अन् बरंच काही! अश्विनी महांगडे करणार राजकारणात प्रवेश?
16
बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज
17
Ola Electric Share Price : तेजीदरम्यान Ola Electric च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोकं धरण्याची वेळ, स्टॉक ₹९० च्या जवळ
18
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
19
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
20
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?

वनविभागाविरुद्ध जनक्षोभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 9:28 PM

वाघिणीने ठार मारलेल्या शेतकºयाच्या घरापर्यंत जाण्याची ४८ तास उलटूनही वन विभागाने तसदी घेतली नसल्याने राळेगाव तालुक्यात वन विभागाविरुद्ध प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे. रविवारी शेकडो नागरिक राळेगाव ठाण्यावर पोहोचले.

ठळक मुद्देवाघिणीचा बारावा बळी : ‘सीसीएफ’वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : वाघिणीने ठार मारलेल्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाण्याची ४८ तास उलटूनही वन विभागाने तसदी घेतली नसल्याने राळेगाव तालुक्यात वन विभागाविरुद्ध प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे. रविवारी शेकडो नागरिक राळेगाव ठाण्यावर पोहोचले. मुख्य वनसंरक्षकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. वनविभाग वाघाचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत नागरिकांनी यावेळी संताप व्यक्त केला.गेल्या दीड वर्षांपासून राळेगाव, कळंब, केळापूर या तालुक्यातील दोन डझन गावात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला आहे. दर महिन्या-दोन महिन्यात एक बळी वाघीण घेत आहे. दरवेळी शासन वाघबळी कुटुंबांची आर्थिक मदत करून बोळवण करते. परंतु अद्यापपर्यंत या वाघिणीचा बंदोबस्त करण्यात वन विभागाला यश आले नाही. दरम्यान लोणी येथील रामा कोंडबा शेंदरे या शेतकºयाचा शनिवारी वाघिणीने फडशा पाडला. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळेच एकापाठोपाठ एक बळी जात असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले. लोणी, वरध परिसरातील शेकडो नागरिक रविवारी राळेगाव पोलीस ठाण्यावर धडकले. ठाणेदार संजय खंदाडे यांना निवेदन देऊन मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. आणखी किती बळी हवे आहेत. वाघिणीचा बंदोबस्त केव्हा करणार, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. संतप्त नागरिकांचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती निमीष मानकर, अरविंद फुटाणे, अरविंद वाढोणकर, अशोक केवटे, प्रवीण कोकाटे, विजय तेलंगे, विनोद भोकरे, बळवंत जगराळे, रवी गलांडे यांनी केले. दरम्यान माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी पोलीस ठाण्यात येऊन कारवाईबाबत विचारणा केली.उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली. शहरातही चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले होते.नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखलेवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी राळेगावात येऊन आमच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करावी. त्यानंतरच शवविच्छेदन करू दिले जाईल, अशी भूमिका रामाजी शेंदरे यांच्या नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. या नातेवाईकांची समजूत तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वृत्तलिहिस्तोवर शवविच्छेदनाला सुरुवात झाली नव्हती.कुटुंब उघड्यावररामाजी शेंदरे यांचा वाघिणने बळी घेतल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. यापूर्वी शेतात काहीच पिकले नाही. त्यामुळे रबीत निदान गहू पेरुन संसाराचा गाडा पुढे हाकण्यासाठी रामाजी स्वत:च्या नऊ एकर शेतात मशागतीकरिता कुटुंबासह गेले होते. कुटुंबातील इतर सदस्य दुसरीकडे काम करीत असताना वाघाने झडप घालून त्यांच्या नरडीचा घोट घेतला. त्यांच्या मागे पत्नी कमलाबाई, मुलगा नारायण असा परिवार आहे.