शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

एसीबी ट्रॅपमध्ये शिक्षेचे प्रमाण नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 8:18 PM

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्यानंतर शिक्षा हमखास होते, असा समज सर्वश्रृत आहे. मात्र आता या समजाला छेद बसला असून यवतमाळ एसीबीने दाखल केलेल्या प्रकरणात वर्षभरात केवळ एका गुन्ह्यात दोषसिद्ध झाला तर तीन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. यावरून एसीबीच्या दोषसिद्धीचे प्रमाण नगण्य असल्याचे स्पष्ट होते.

ठळक मुद्देवर्षभरात एकच शिक्षा : एकूण १४४ प्रकरणे न्यायालयात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्यानंतर शिक्षा हमखास होते, असा समज सर्वश्रृत आहे. मात्र आता या समजाला छेद बसला असून यवतमाळ एसीबीने दाखल केलेल्या प्रकरणात वर्षभरात केवळ एका गुन्ह्यात दोषसिद्ध झाला तर तीन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. यावरून एसीबीच्या दोषसिद्धीचे प्रमाण नगण्य असल्याचे स्पष्ट होते.एसीबीच्या सापळा कारवाईत अनेक तांत्रिक बाबींचा वापर केला जातो. पूर्वी पंच न्यायालयात होस्टाईल (फितूर) होत असल्याने आता प्रत्येक कारवाईदरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांनाच पंच म्हणून ठेवण्यात येते. याचा फायदा सुरुवातीला मिळाला. दोषसिद्धीचे प्रमाण वाढले. मात्र आता पुन्हा उतरतीकळा लागली आहे. ट्रॅप झाल्यानंतर एसीबीकडून दोषारोपपत्र सादर करण्यासाठी आरोपी लोकसेवकाच्या सक्षम अधिकाºयाकडे परवानगी मागितली जाते. ही परवानगी मिळताच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाते. ही प्रकरणे अनेक दिवस रेंगाळत असल्याने साक्ष-पुराव्याच्या वेळी फिर्यादीच्या बयानात बरीच तफावत राहते. याचा फायदा बचाव पक्षाचे वकील घेतात. तसेच दोषारोपपत्रातही उणिवा राहत असल्याने सरळ लाभ आरोपीला मिळतो. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून एसीबीच्या प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी वरिष्ठांकडून सातत्याने निर्देश दिले जातात. मात्र वर्षभरातील ट्रॅपची संख्या व आरोपी हीच आपली कामगिरी समजून गुन्हे सिद्ध करण्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. लाच घेणे किंंवा लाचेची मागणी करणे यावरूनही गुन्हा दाखल होतो. तत्काळ तपासही केला जातो. पुढे मात्र त्याचा योग्य पाठपुरावा होत नसल्याने बहुतांश प्रकरणात आरोपींना न्यायालयात फायदा मिळत आहे.सापळ्यासाठी तांत्रिक साधनानंतरही अपयशएसीबीकडून सापळा रचताना तांत्रिक साधनांचाही वापर केला जातो. प्रामुख्याने लाचेची मागणी किंवा स्वीकारताना होत असल्याच्या प्रकरणांमध्ये फिर्यादीला कॉल रेकॉर्ड करणे, व्हीडीओ चित्रीकरणाचीही सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतरही दोषसिद्धी मात्र कमी आहे.