शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

पुसद काँग्रेसला लागली उतरती कळा

By admin | Published: November 24, 2015 5:40 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुसद तालुक्यात एकेकाळी काँग्रेसचे चांगलेच वजन होते. गावागावात कार्यकर्ते होते.

अखिलेश अग्रवाल ल्ल पुसदराष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुसद तालुक्यात एकेकाळी काँग्रेसचे चांगलेच वजन होते. गावागावात कार्यकर्ते होते. शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल असायची. परंतु गत काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचा ना कोणता कार्यक्रम, ना सामाजिक हालचाली. जणू पुसद तालुक्यातील काँग्रेसला उतरती कळाच लागली आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची हालत आणखी गंभीर झाली आहे. या निवडणुकीच्या काळात कुंपणावर असणारे पुढारी दुसरीकडे उड्या घेऊ लागले. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्येही पक्षाच्या नेतृत्त्वावर विश्वास दिसत नाही. त्यांनी काँग्रेसशी तात्पुरता काडीमोड देखील घेतला आहे. मात्र याची फळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. काँग्रेसमुळे राष्ट्रवादीला मात्र चांगले दिवस आले. परंतु आजही यातून काँग्रेस धडा घ्यायला तयार नाही. पुसद शहरात स्वातंत्र्यापूर्वीपासून काँग्रेस भवन आहे. परंतु ही वास्तू गत २० वर्षांपासून अर्धवट बांधकाम झालेल्या अवस्थेत आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी येथे दोनदा ध्वजारोहण होते. परंतु कार्यक्रमाला काही मोजकेच कार्यकर्ते हजर राहतात. एवढाच काय तो येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनशी संबंध. नंतर वर्षभरात कुणी नेतेच काय कार्यकर्तेही इकडे फिरकत नाही. काँग्रेसची राज्यात सत्ता असतानाही काँग्रेस भवनाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. यासाठी स्थानिक नेतेच जबाबदार असल्याचे बोलले जाते. आता तर काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ असलेल्या महान विभूतींच्या जयंती व स्मृतिदिनाचा काँग्रेसला विसर पडला की काय, असे म्हणावे लागते. ३१ आॅक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन आणि १९ नोव्हेंबर रोजी जन्मदिन होता. या दोनही दिवशी पक्षाकडून साधा आदरांजलीचा कार्यक्रमही घेण्यात आला नाही. तर दुसरीकडे शहर काँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये विभाजन झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. १४ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. सचिन नाईक यांनी विश्रामगृहावर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आपल्या काही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरी केली. परंतु शहर काँग्रेस कमिटीला पंडित नेहरू यांच्या जयंतीचा विसर पडावा ही आश्चर्याची बाब आहे.एकेकाळी काँग्रेसचा गड पुसद तालुका मानला जायचा. १३ वर्षे ज्यांनी राज्याची धुरा आपल्या हातात ठेवली, असे नेतृत्त्व दिले. त्याच काँग्रेस पक्षाला सुस्ती चढण्याचे कारण काय, याचा शोध घेण्याची गरज आहे. २०१६ मध्ये नगरपरिषद निवडणूक आणि २०१७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. तेव्हा आत्ताच मरगळ झटकून कामाला लागण्याची गरज आहे. अन्यथा या मरगळीचा फायदा दुसरेच घेतील यात शंका नाही. काँग्रेसने वेळीच धडा घेतला नाही तर काँग्रेस तालुक्यातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नसल्याचे जाणकर सांगतात.