शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

रबी पिकांचे क्षेत्र घटले

By admin | Published: November 23, 2015 2:13 AM

मागील वर्षाच्या तुलनेत दारव्हा तालुक्यात रबी पिकांचा पेरा कमी झाला आहे. यंदा पर्जन्यमानसुद्धा कमी झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली ...

दारव्हा : मागील वर्षाच्या तुलनेत दारव्हा तालुक्यात रबी पिकांचा पेरा कमी झाला आहे. यंदा पर्जन्यमानसुद्धा कमी झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली परिणामामुळे शेतकऱ्यांनी विहिरीतील पातळीचा अंदाज घेवून रबी पिकांच्या पेरणीत कमी क्षेत्र गुंतविले आहे. मागील पंधरवाड्यापासून ढगाळी वातावरण होत असल्याने याचा परिणाम तूर पिकावर जाणवत आहे. बहुतांश शेतकरी तुरीवर किटकनाशकांच्या फवारणीत व्यस्त झाला आहे.यावर्षी पावसाळ्यात परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत ओल कमी होती. सोयाबीन पीक काढणी झाल्याबरोबर चना उत्पादक शेतकरी पेरणी करायचे. जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे चन्याची उगवण योग्य होते. नंतर दोन पाण्याच्या पाळ्या दिल्या तरी पीक हाती येत होते. परंतु यंदा जमिनीत योग्य ओलावा नसल्याने व पाण्याची पातळीही कमी झाल्याने तालुक्यात रबीच्या पेऱ्यात घसरण झाली आहे. मागच्या वर्षी साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावर तालुक्यात रबी पिकाची पेरणी झाली होती. यावर्षी क्षेत्र कमी होवून नोव्हेंबर अखेरचा आठवडा आल्यावरही केवळ साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा व चारा पिके पेरली आहेत. अडत्तण नदीवर असलेल्या म्हसणी धरणात सध्या ४१ दलघमी एवढा साठा उपलब्ध आहे. तालुक्यात या अडाण प्रकल्पाचे कालवे आहेत. प्रकल्पापासून ३१ व्या किमीपर्यंत येत असलेल्या शेतकऱ्यांकरिता यावर्षी ओलिताकरिता पाच पाण्याच्या पाळ्यांसाठी पाणी सोडल्या जात आहे. तर ३२ ते ४१ व्या किमीसाठी हरभरा पिकाकरिता तीन पाण्याच्या पाळ्या होईल अशा रितीने पाणी सोडणार असल्याचे अडाण प्रकल्पाच्या सूत्रांनी सांगितले आहे. यासाठी प्रत्येक सातबाराधारकाला एक एकर गहू व एक एकर हरभरा पीक पेरा अशी मर्यादा ठरवून दिलेली आहे. अडाण प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर किमान दोन हजार हेक्अर क्षेत्र ओलित अपेक्षित आहे.विहिरीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज घेत काही शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या पिकांची पेरणी न करता सध्या शेतात उभ्या असलेल्या कापूस व तूर पिकाला ओलित करून उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने नियोजन करून ओलितास प्रारंभ केला आहे. त्यात बाजारात तूर डाळीचे भाव वाढल्याने यंदा तूर पिकालाही उत्तम भाव मिळतील या आशेने शेतकरी तूर पिकांची निगा घेताना दृष्टिपथास पडत आहे. सध्या तूर पीक फुलोरा व शेंगांच्या अवस्थेत आहे. ढगाळी वातावरणाने तुरीवर अळ्यांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्यावर योग्य कीटकनाशकाची शिफारशीनुसार फवारणी करावी अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)