शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे अवॉर्ड थांबले

By admin | Published: January 19, 2016 3:39 AM

जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला अद्यापही ग्रहण लागले

वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्ग : रूळाचे अलायमेंट बदलल्याने निधी वाटपात तांत्रिक अडचणयवतमाळ : जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला अद्यापही ग्रहण लागले आहे. त्या मार्गाच्या भूसंपादनासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त असतानाही त्याला वेळोवेळी इतर विभागाच्या कामात जुंपले जाते. त्यामुळे २००८-०९ पासूनची भूसंपादन प्रकरणे रेंगाळली आहेत. आता तर रेल्वे मार्गाचे अलायमेंट निश्चित नसल्याने जमिनीचे अवॉर्ड करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. एकूण २८४ किलोमिटर लांबीच्या या प्रस्तावित मार्गाचा सर्वाधिक म्हणजे १८० किलोमीटरचा भाग यवतमाळ जिल्ह्यात येतो. कळंब तालुक्यातून जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली यात १४० शेतकऱ्यांची ४५ हेक्टर जमिन लोहमार्गात जाणार आहे. लोहमार्गासाठी भूसंपादीत करण्यासाठी अनेक वर्षांपासून नियमित भूसंपादन अधिकारीच नव्हता. त्यामुळे २००८-०९ पासूनची प्रकरणे येथे प्रलंबित होती. उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या रुपाने पूर्णवेळ भूसंपादन अधिकारी मिळाला. मात्र दुर्देवाने येथेही पाठ सोडली नाही. भाकरे यांच्याकडे रोहयो त्यानंतर महसूल यांसारख्या व्यस्त विभागांचा प्रभार देण्यात आला. परिणामी भूसंपादनाची प्रक्रिया आणखी मंदावली. तरीही या काळात अकरा प्रकरणांचा नवीन भूसंपादन कायद्यानुसार निपटारा करण्यात आला. ही प्रकरणे अंतिम निवाड्यासाठी ठेवली असतानाच रेल्वे रुळाच्या अलायमेंटचा प्रश्न निर्माण झाला. यामध्ये प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांची जमिन गेली त्यांच्याऐवजी इतर कोणाला लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली. हे टाळण्यासाठीच निकाली निघालेल्या अकरा प्रकरणांचे अवॉर्ड थांबविण्यात आले. आता रेल्वेच्या तांत्रिक विभागाकडून रेल्वे मार्गाचे अलायमेंट निश्चित झाल्यानंतरच कारवाई केली जाणार आहे व शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात येणार आहे. जिल्हावासीयांची या रेल्वे मार्गासंदर्भात मोठी अपेक्षा आहे. त्यासाठी तब्बल ५५० हेक्टर शेतजमिन भूसंपादित करावी लागणार आहे. या रेल्वे मार्गावर एकूण २८ स्टेशन प्रस्तावित आहेत. त्यामध्ये जिल्हयातील कळंब, तळेगाव, यवतमाळ, बोथबोडन, लाडखेड, तपोना, दारव्हा, अंतरगाव, हरसूल, वाई, दिग्रस, बेलवन, पुसद, हर्षी, शिळोणा, उमरखेड हे स्टेशन राहणार आहेत. या मार्गावर एकूण सहा बोगदे राहणार आहेत. या मार्गाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती देण्यासाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याशिवाय जिल्हावासियांचे रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार नाही. (कार्यालय प्रतिनिधी)