शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; बळीराजाचा हुरूप वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2022 8:24 PM

Yawatmal News रविवारसह सोमवारीही यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. व पेरण्यांना गती आली आहे.

ठळक मुद्देकेळापूर, झरीजामणी, वणीला पावसाने झोडपले

यवतमाळ : मागील महिनाभरापासून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. रविवारसह सोमवारीही जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाल्याने खोळंबलेल्या पेरण्यांना आता गती आली आहे. केळापूर तालुक्यासह झरीजामणी, मारेगाव, वणी आणि घाटंजी तालुक्यात जोरदार पाऊस झाला असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र, जून महिन्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली. अनेक तालुक्यात अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मोठ्या भागात पेरण्याही खोळंबल्या आहेत. जुलै महिना सुरू झाल्यानंतर मात्र पावसाळी वातावरण तयार झाले असून रविवारनंतर सोमवारीही यवतमाळसह जिल्ह्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. केळापूर तालुक्यात सर्वाधिक सरासरी ५०.६ मिमी पाऊस झाला आहे तर झरी जामणी तालुक्यात ४०.२, मारेगाव ३४.८, वणी ३८.४, महागाव १६.५, उमरखेड १९.१, पुसद १०.८, नेर १८.९, आर्णी ११.४, दिग्रस १२.२, दारव्हा २२.६, कळंब २०.६, बाभूळगाव १४.१, घाटंजी ३१.३, राळेगाव ८.५ तर यवतमाळ तालुक्यात सरासरी २८.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या खरबी (किनवट) पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पुलावर खड्डे असल्याने वाहन चालकांना वाहन धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. याबरोबरच अनेक ठिकाणी रस्त्याकडेच्या नाल्या तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याचे तर काही ठिकाणी पाणी घरात शिरल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :agricultureशेती