शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पावसाने फिरवली पाठ, शेतकऱ्यांची लावली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:27 AM

पुसद : तालुक्यात जवळपास १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे इवल्या पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. पावसाअभावी पिके कोमेजत ...

पुसद : तालुक्यात जवळपास १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे इवल्या पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. पावसाअभावी पिके कोमेजत आहेत. पाऊस रुसून बसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे.

तालुक्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्यामुळे यावर्षी मृगाची पेरणी साधेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. प्रत्यक्षात मृग नक्षत्र मृगजळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त होत आहे. त्यानंतर पावसाचे कम बॅक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या. त्यात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, उडीद, मूग, हळद आदी पिकांचा समावेश आहे.

खरीप पेरण्या झाल्यानंतर जवळपास १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येऊ पाहत आहे. तालुक्यातील आडगाव, मारवाडी, रोहडा, बेलोरा, पांढुर्णा, हिवळणी, मांजरजवळा, हनवतखेडा, खंडाळा, जवळी, फेट्रा या भागामध्ये खरीप पेरण्यांना फटका बसला आहे. उधार, उसणवारी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. परंतु पावसाअभावी पेरण्या वाया जाणार असल्याने आता पुन्हा पेरण्या करण्यासाठी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणावेत, असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे.

दुबार पेरणीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना बियाणे व खते खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. दररोज ढगाळ व पावसाळी वातावरण दिसून येते. आज पाऊस नक्की येणार असे वातावरण दिसत असताना रोज पाऊस हुलकावणी देतो. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.

बॉक्स

हंड्याने पाणी देऊन पीक जगविण्याची धडपड

पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. विहिरीला पाणी नाही. शेतातील भाजीपाला पिकांना जीवनदान देण्यासाठी हंड्याने पाणी आणून पिकांना जगवावे लागत आहे, असे रोहडा येथील शेतकरी राजू मारोती पोपळघट यांनी सांगितले.