शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

आदिवासी भगिनींच्या राख्या पोहोचल्या सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2021 11:20 AM

Yawatmal News आदिवासी भगिनींनी बांबूपासून राखी बनविण्याचे काम सुरू केले आहे. या राख्या राज्यातील विविध जिल्ह्यासह ४० देशात पोहोचल्या आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधानांनी घेतली दखल४० देशांची पसंती

 

रूपेश उत्तरवार

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी समाज विविध कलेच्या बाबतीत समृध्द आहे. आदिवासी आणि बांबूकला हा अविभाज्य अंग राहिला आहे. आदिवासींची ही कला जिवंत ठेवण्यासाठी लवादा (ता.धारणी, जि.अमरावती) येथे केंद्र सुरू करण्यात आले. या ठिकाणी आज जवळपास ४०० कारागीर बांबूच्या विविध वस्तू बनवित आहे. विशेष म्हणजे, आदिवासी भगिनींनी बांबूपासून राखी बनविण्याचे काम सुरू केले आहे. या राख्या राज्यातील विविध जिल्ह्यासह ४० देशात पोहोचल्या आहेत.

पर्यावरण समृध्दीसाठी जगभरात काम हाेत आहे. याचाच एक भाग म्हणून आदिवासी समाजबांधव पुढे सरसावले आहे. पांढरकवडा आणि मेळघाट हा आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जातो. या भागात बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. यापासून विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार केल्या जातात. फ्लाॅवर पाॅट, पेपरवेट, घर, घड्याळ आणि इतर शोभेच्या वस्तू बनविण्यात आदिवसी बांधव तरबेज आहे. याच कलेला राखीची जोड देत बांबूपासून राखी बनविण्याचे मोठे काम महिलांनी हाती घेतले आहे.

गतवर्षी अशा ४० हजार राख्या बनविण्यात आल्या होत्या. या देशभरात विक्री करण्यात आल्या. आता ५० हजार राखीचे नियोजन त्यांनी केले आहे. बारीक कमच्यापासून बनविलेल्या या राख्या आदिवासी कारागिरांच्या उपजीविकेचे साधन झाले आहे. या राख्यांना आज राज्यासह विविध देशातून मागणी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेेतली. लवादच्या केंद्राची धुरा सुनील देशपांडे (दिवंगत) यांनी सांभाळली होती. आता त्यांच्या पत्नी निरुपमा देशपांडे या ही कला विकसित करण्यासाठी आणि आदिवासी समाजाला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी काम करीत आहे.

बालकांना आकर्षित करणारी कला

लवादा केंद्रातील महिलांनी विविध कलाकुसरीच्या राख्या तयार केल्या आहेत. बालकांना आकर्षित करेल, अशाही राख्या त्यांनी बनविल्या. याशिवाय मोर, स्वस्तिक, डोळे यासह काही शुभसंकेताचे चिन्ह प्रतिबिंबित करणाऱ्या राख्या घडविल्या आहेत.

 

आदिवासी महिलांनी तयार केलेली एक राखी विकली गेली तर एका वेळच्या भोजनाची चिंता मिटते. दुर्गम भागातील महिलांना रोजगार मिळावा म्हणून हे केंद्र काम करीत आहे. त्यातूनच बांबूपासून राख्यांची निर्मिती झाली आहे.

निरुपमा देशपांडे, अध्यक्ष, संपूर्ण बांबू केंद्र, लवादा

टॅग्स :Rakhiराखी