शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

रणेत्यांचा पुसद तालुकाच जलसंधारणात पिछाडीवर

By admin | Published: April 16, 2017 1:12 AM

महाराष्ट्र राज्यात जलसंधारणासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती करणारे पाणी अडवा, पाणी जिरवा हा मूलमंत्र देणारे जलसंधारणाचे प्रणेते ....

प्विदारक वास्तव : सुधाकरराव नाईकांच्या पुण्याईचा विसरपुसद : महाराष्ट्र राज्यात जलसंधारणासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती करणारे पाणी अडवा, पाणी जिरवा हा मूलमंत्र देणारे जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुसद तालुकाच जलसंधारणात पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. दुष्काळी परिस्थितीच्या तोंडावर पुसद तालुक्यातील शासकीय अधिकारी अनास्था दाखवत आहेत. तर गावागावातील लोकप्रतिनिधींची अनास्था राहिल्याने जलसंधारणाच्या कामामध्ये तालुका मागे पडला आहे. आज अनेक गावांमध्ये ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने जलक्रांतीचे नवे पर्व उभे राहात असताना पुसद तालुक्यात मात्र जलसंधारणाच्या कामांचे तीनतेरा वाजले आहेत. माळपठार भागासह तालुक्यात टंचाई पाचवीलाच पुजलेल्या पुसद तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि जनतेने हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. पंचेविस वर्षापूर्वी या महाराष्ट्रात पहिल्यांदा जलसंधारण विभागाची निर्मितीचा मूलमंत्र देणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुसद तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांना जलसंधारणाचा जणू विसरच पडला की काय, अशी अवस्था आज पाहावयास मिळत आहे. अडीच वर्षांपूर्वी युती सरकारने सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र हे ब्रिद घेवून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात पहिल्या वर्षी पुसद तालुक्यात दमदार सुरुवात करण्यात आली. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना अनेक गावांमध्ये राबविण्यात आली. दुसऱ्या वर्षी मात्र जलयुक्त शिवार अभियानाबाबत असलेला जोश ओसलेला दिसत आहे. लोकसहभाग कमी आणि जलसंधारणाच्या कामात ठेकेदारी बोकाळली. कामे निकृष्ट होऊ लागली. अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे यावर्षी तर पुसद तालुक्यात सगळीकडे आनंदी आनंदच दिसत आहे. शासनाचे सर्वच विभाग कोमात गेले आहेत. जी थोडीफार कामे सुरू आहेत, ती निकृष्ट दर्जाची होत आहे. अशा कामांच्या तक्रारीही येत आहेत. शासन स्तरावरुन लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचा निष्क्रिय कारभार चव्हाट्यावर पुसद तालुक्यातील गहुली गावाने राज्याला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन मुख्यमंत्री दिलेत. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचा मंत्र व सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाचा मंत्र महाराष्ट्राला दिला. पण आज पुसद तालुक्यातील नागरिकांना हरितक्रांती व जलक्रांतीचा पूर्णत: विसर पडल्याचे वास्तव आहे. तालुक्यात कोणतेच अधिकारी सक्रिय होऊन काम करताना दिसत नाहीत. एकंदरीत जलसंधारणात पुसद तालुका पिछाडीवर गेला आहे.