शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

रेशनचे स्वस्त धान्य किराणा दुकानात

By admin | Published: November 21, 2015 2:55 AM

परिसरातील परवानाधारकांकडून स्वस्त धान्याचा प्रचंड प्रमाणात काळा बाजार केला जात आहे.

वडकी : परिसरातील परवानाधारकांकडून स्वस्त धान्याचा प्रचंड प्रमाणात काळा बाजार केला जात आहे. गरिबांना त्यांच्या हक्काचे धान्य न देता ते किराणा दुकानात पोहोचत आहे. परिणामी अनेक रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित राहात आहे. पुरवठा विभागाकडूनही कठोर कारवाई होत नसल्याने धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. आदिवासी बहुल या परिसरातील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा परवानाधारक उचलत आहेत. ग्रामीण भागातील जनतेला धान्य न देता वडकीसारख्या मोठ्या गावामध्ये आणून किराणा दुकानात विकले जाते. आता शेतकऱ्यांसाठीही ही योजना सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी प्रती किलो, प्रती व्यक्ती पाच किलो याप्रमाणे धान्यपुरवठा केला जातो. यासाठी दर निश्चित करण्यात आले आहे. गहू दोन रुपये आणि तांदूळ तीन रुपये किलो याप्रमाणे दर आहे. मात्र काही परवानाधारक यापेक्षा जादा दर घेण्यासोबतच रेशनही कमी देत असल्याच्या तक्रारी आहे. काही गावांचा धान्य पुरवठा एकाच व्यक्तीकडे आहे. अधिकाऱ्यांकडून अशा व्यक्तीवर कारवाई केली जात नाही. पुरवठा अधिकाऱ्याकडून धान्य दुकानांची तपासणी कधीही केली जात नाही. झाली तरी प्रत्यक्ष दुकानात पोहोचत नाही. परवानाधारकांनाच दस्तावेज घेऊन तालुक्याच्या ठिकाणी बोलाविले जाते. परवानाधारकाच्या सोयीनुसार नोंदी केल्या जातात. रेशनचा काळा बाजार रोखण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या दक्षता समित्याही कागदावरच आहे. या दक्षता समितीचा फलक कुठल्याही दुकानात लावण्यात आलेला नाही. समितीमध्ये कोण आहे, हे गावकऱ्यांनाही माहीत नाही. शिवाय दक्षता समितीकडूनही आपली जबाबदारी पार पाडली जात नाही. त्यामुळे रेशन परवानाधारकांची मनमानी सुरू आहे. पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन गरिबांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)