शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

मारेगाव तालुक्यात जुलै महिन्याचे रेशन वाटप ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 18:31 IST

साठा उपलब्ध : मशीनच्या तांत्रिक अडचणीत शिधावाटप थांबले

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : रेशन धान्य वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शिधावाटप दुकानात धान्य असूनही ते मिळत नसल्याचे समोर आले आहे. रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या नागरिकांना कामाचे खाडे पाडून रेशन दुकानासमोर घालवावे लागत असल्याने मारेगाव तालुक्यातील नागरिक चांगलेच वैतागलेले आहेत. प्रसंगी नागरिक धान्य दुकानदार यांच्यावर ताशेरे ओढून शिवीगाळ करू लागले आहेत. यामुळे धान्य दुकानदारांना परिस्थिती हाताळणे कठीण झाले आहे.

ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने वैतागलेल्या तालुक्यातील रेशन दुकानदारांनी जुलै महिन्याचे अजूनही धान्य वाटप व्हायचे असून, जुलै महिन्यातील धान्याला मुदत वाढवून देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. नागरिक भांडणे करून मारण्याची धमकी देत असल्याने संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानांमार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी, या हेतूने राज्यभरात ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाला आहे.

परंतु, ई-पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत. परिणामी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत. अनेक गावांतील नागरिक रेशन दुकानासमोर नारे देत शासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आवाज उठवत असल्याचे चित्र गावागावांत पाहायला मिळत आहे.

गरीब कुटुंबांना पुरेसे अन्न मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने अशा गरीब व सर्वसामान्य कुटुंबासाठी स्वस्त दरात अथवा मोफत रेशन उपलब्ध करून देण्याची योजना अंमलात आणली. रोजंदारीवर कामाला जाणारे कार्डधारक सकाळी ७ वाजेपासून दुकानांसमोर ताटकळत उभे असतात. दुकानात धान्य साठा शिल्लक असून सुद्धा मशीनवर धान्य उपलब्ध होत नसल्यामुळे धान्य देता येत नाही. यामुळे दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे अनेक लाभार्थी हवालदिल झाले आहेत.

मुदत वाढविण्यासाठी पाठविले पत्रई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येण्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचे धान्य वाटप पूर्ण होऊ शकले नाही. याबाबत जुलै महिन्यातील धान्यवाटपाची मुदत वाढवून देण्यासाठी वरिष्ठांना पत्र दिले असून, लवकरच त्याला मान्यता मिळेल. कोणीही धान्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळgovernment schemeसरकारी योजना