शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

पुनर्विलोकनाने केला घाटंजी, आर्णीचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 9:24 PM

आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतींबाबत शासनाने पुनर्विलोकन केले आहे. मात्र, जिल्ह्यातील घाटंजी आणि आर्णी तालुक्यातील कर्मचाऱ्यांना आता लाभातून वगळण्यात आले.

ठळक मुद्देलाभातून डावलले : शिक्षक समन्वय समितीने घेतली खासदारांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतींबाबत शासनाने पुनर्विलोकन केले आहे. मात्र, जिल्ह्यातील घाटंजी आणि आर्णी तालुक्यातील कर्मचाऱ्यांना आता लाभातून वगळण्यात आले. ‘कठीण क्षेत्रा’च्या निकषात बसत असतानाही या दोन तालुक्यांचा समावेश न झाल्याने हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट खासदारांकडे धाव घेतली आहे.राज्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना गेल्या १५ वर्षांपासून एकस्तर पदोन्नतीसह विविध बिगर आर्थिक स्वरुपाचे लाभ दिले जातात. परंतु, गेल्या वर्षी राज्य शासनाने या सवलतींचा फेरविचार केला. हे लाभ जैसे थे ठेवावे की बंद करावे, याबाबत नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समिती नेमण्यात आली होती. या समितीने अहवाल शासनाला सादर केला.त्यात आदिवासी व नक्षलग्रस्त भाग असे वर्गीकरण करण्याऐवजी ‘कठीण भाग’ व ‘सर्वसाधारण भाग’ असे वर्गीकरण करण्यात आले. कठीण भागात राज्यातील ६२ तालुक्यांचा समावेश करण्यात आला. आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव, झरीजामणी, घाटंजी, आर्णी या तालुक्यांना प्रोत्साहनपर सवलती मिळत होत्या. नव्या अहवालात मात्र घाटंजी, आर्णी, वणी आदी तालुक्यांना डावलण्यात आले. त्यामुळे या तालुक्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांनी समन्वय समितीच्या नेतृत्वात थेट खासदार हंसराज अहीर यांच्याकडे व्यथा मांडली. तसेच आमदार राजू तोडसाम यांनाही निवेदन दिले. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष रवींद्र उमाटे, सचिव विशाल साबापुरे, मनोज गवळी, एस. पी. लाकडे, प्रशांत गवळी, संतोष कर्णेवार, अशोक माहुर्ले, रमेश डोहळे, रमेश कनाके, गजानन बेजारपवार, उषाताई बावनकुळे, स्वाती महाजन आदी उपस्थित होते.मानव विकास मिशनमध्ये पात्रपुनर्विलोकन समितीने ‘कठीण क्षेत्र’ ठरविताना प्रामुख्याने मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले. घाटंजी आणि आर्णी या दोन्ही तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक कमी आहे. या तालुक्यांमध्ये मानव विकास मिशन अंतर्गत विविध कामेही सुरू आहेत. तरीही ‘कठीण क्षेत्रात’ या तालुक्यांना स्थान न दिल्याने कर्मचाºयांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर