शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
4
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
5
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
6
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!
7
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
8
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
9
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
10
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
11
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
12
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
13
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
14
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
15
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
16
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
17
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
18
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
19
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
20
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

पाच एकरातील उभ्या संत्रावर फिरविली आरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 5:00 AM

शेतकरी रघुनाथ मेश्राम यांनी उमरी येथे आपल्या पाच एकरात संत्रा बगीचा लावला होता. संत्रा आणि भाजीपाला विकून ते कुुटुंब चालवितात. संपूर्ण तालुक्यात संत्रा ते प्रसिद्ध आहे. मात्र यंदा पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाले. झाडावरील काही फळे चोरट्यांनी लंपास केली. रघुनाथ मेश्राम यांचे वय ६५ झाले आहे. त्यामुळे आता आपण कुणाशी भांडूही शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

हरिओम बघेललोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : अस्मानी व सुलतानी संकटामुळे सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहे. शासकीय धोरणामुळे अनेक शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. याच संतापातून तालुक्यातील उमरी येथील एका वृद्ध शेतकऱ्याने तब्बल पाच एकरावर उभ्या असलेल्या संत्रा झाडांवर आरी चालविली. शेतकरी रघुनाथ मेश्राम यांनी उमरी येथे आपल्या पाच एकरात संत्रा बगीचा लावला होता. संत्रा आणि भाजीपाला विकून ते कुुटुंब चालवितात. संपूर्ण तालुक्यात संत्रा ते प्रसिद्ध आहे. मात्र यंदा पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाले. झाडावरील काही फळे चोरट्यांनी लंपास केली. रघुनाथ मेश्राम यांचे वय ६५ झाले आहे. त्यामुळे आता आपण कुणाशी भांडूही शकत नाही, असे त्यांनी सांगितले.पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाल्याने हताशपणे त्यांनी आता फळांनी लदबलेली पाच एकरातील संपूर्ण बागच काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाच एकरातील संत्रा झाडांवर आरा चालविला. पावसामुळे नुकसान होऊनही शासकीय कर्मचारी संवेदनशीलपणे वागत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शासनदरबारी कुणीच दखल घेत नाही. त्यामुळे आपण हा टोकाचा निर्णय घेतल्याचे मेश्राम यांनी सांगितले. 

आरा चालविताना डोळ्यांत अश्रू मुलाप्रमाणे जपलेली संत्राबाग स्वत:च काढून टाकताना रघुनाथ मेश्राम यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. शासन आणि कृषी विभागाने कोणतीही मदत न केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. या झाडांचे आता संरक्षण करू शकत नसल्याने पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या संत्राबागेवर आरा चालवीत असल्याचे त्यांनी सांगितले.