शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
2
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
3
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
4
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
5
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
6
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
7
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
8
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
9
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
10
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर
11
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
12
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
13
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
14
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
15
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
16
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
17
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
18
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
19
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
20
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट

शेतकरी कर्जमुक्तीला नियम, अटींचे जोखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 5:00 AM

कर्जमुक्तीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांना रिझर्व्ह बँकेची परवानगी हवी आहे. जिल्हा सहकारी बँकेने आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू केली. मात्र त्यासाठी थम्ब अथेन्टिकेशन करावे लागेल. तथापि कोरोनामुळे राज्यभरातील थम्ब मशीन बंद करण्यात आल्या. शिवाय मयत शेतकरी, आधार अपडेट नसेल तर थम्ब अथेन्टिकेशन कसे होणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये नाराजी : दारव्हा तालुक्यात थम्ब ऑथेन्टिकेशनची समस्या

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी नवीन अध्यादेशानुसार पुनश्च सुरू झाली. मात्र यातील नियम व अटींच्या जोखडांमुळे तालुक््यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.कर्जमुक्तीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांना रिझर्व्ह बँकेची परवानगी हवी आहे. जिल्हा सहकारी बँकेने आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू केली. मात्र त्यासाठी थम्ब अथेन्टिकेशन करावे लागेल. तथापि कोरोनामुळे राज्यभरातील थम्ब मशीन बंद करण्यात आल्या. शिवाय मयत शेतकरी, आधार अपडेट नसेल तर थम्ब अथेन्टिकेशन कसे होणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्यासाठी ही योजना जाहीर केली होती. योजनेची अंमलबजावणी सुरु असताना लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे पोर्टलवरील ई-केवायसी प्रक्रीया बंद ठेवण्यात आली. तसेच ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता आदी कारणांमुळे यवतमाळसह विदर्भातील अनेक जिल्ह्यातील शेतकºयांना लाभ मिळू शकला नाही.दरम्यान ज्या शेतकऱ्यांची नावे कर्जमुक्तीच्या यादीत आली, त्यांचे आधार प्रमाणिकरणाची कार्यवाही पुन्हा सुरु करण्यात आली आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली, अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामात नव्याने पीक कर्ज वाटप करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित झाला. शेतकºयांच्या कर्ज खात्यावर असलेली रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी व त्यांना पीक कर्ज वाटप करावे, अशा सूचना बँकाना देण्यात आल्या. पात्र शेतकºयांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. शेतकऱ्यांनी त्यांचे नाव यादीमध्ये पाहून कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी आपले सरकार सुविधा केंद्र, कॉमन सर्व्हीस सेंटर अथवा संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन यवतमाळच्या जिल्हा उपनिबंधकांनी केले. मात्र काही राष्ट्रीयीकृत बँकेकडे चौकशी केली असता रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय राज्य शासनाच्या हमीवर योजना राबविता येणार नसल्याचे सांगण्यात आले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू केली. परंतु शेतकऱ्यांना थम्ब अथेन्टीकेशन करावे लागणार आहे. मात्र कोरोनामुळे थम्ब मशीन बंद करण्यात आल्या. शेतकऱ्यांना मात्र थम्ब अँथेन्टिकेशन करण्याचे सांगण्यात आले. शिवाय कर्जमुक्तीचे काही लाभार्थी मयत झाले. त्यांच्या वारसांना सध्या लाभ मिळू शकणार नाही. ज्यांचे आधार अपडेट नाही, त्यांना परत जावे लागत आहे. काहींचे थम्ब मिस मॅच होत आहे. दुसरीकडे खरीप हंगाम सुरू झाल्याने तत्काळ पीक कर्ज मिळावे, अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणासाठी चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहे.विनाअट पीक कर्ज वाटप कराराज्य शासनाने वंचित शेतकºयांची हमी घेऊन पीक कर्ज मिळवून देण्यासाठी चांगला निर्णय घेतला. मात्र आधार प्रमाणिकरणाची अट घातल्याने खोळंबा होत आहे. थम्ब अथेन्टिकेशनमुळे कोरोना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही. गर्दी वाढली तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही. तसेच मयत शेतकरी, थम्ब मिस मॅच आदी अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनाकडे असल्याने त्यानुसार तत्काळ पीक कर्ज वाटप करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज