शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘सबला व अमृत’ला आधार नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:40 IST

आधार कार्ड नसल्यास सबला आणि अमृत आहार योजनेचा लाभ नाकारला जाणार आहे. याचा फटका गरीब आणि गरजू कुटुंबाला बसणार आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणारी ही बाब आहे.

ठळक मुद्देसक्ती टाळा : राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आधार कार्ड नसल्यास सबला आणि अमृत आहार योजनेचा लाभ नाकारला जाणार आहे. याचा फटका गरीब आणि गरजू कुटुंबाला बसणार आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणारी ही बाब आहे. सदर योजनेसाठी आधारची सक्ती केली जाऊ नये, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी जिल्हा महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. क्रांती राऊत (धोटे) यांनी नेतृत्त्व केले.कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी गरीब गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींसाठी सबला आणि अमृत आहार योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. मात्र या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. जगविण्यापेक्षा ओळखपत्राला अधिक महत्त्व देण्याच्या या भूमिकेमुळे अनेक बालक आणि महिलांना या मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे. विशेषत: बेघर, स्थलांतरित आणि रहिवासी पुरावा नसलेल्या कुटुंबांना याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. मुलभूत मानवी हक्काची पायमल्ली या सक्तीमुळे होत आहे. शिवाय पोषण आहाराचे सहा महिन्याची देयकेही महिला बचत गटांनी सरकारला दिलेली नाही. ही बाब गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कुपोषणाचा टक्का घटावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांनाच याचा लाभ दिला जाणार आहे. यावर विचार व्हावा असे म्हटले आहे. निवेदन देताना वनमाला अवथळे, नीलिमा राऊत, माधुरी कदम, नयंती वैद्य, अश्विनी टेकाम, नंदिनी अवथळे, लीना तराळे आदींची यावेळी उपस्थिती होती.