शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून प्रवाशांच्या सुरक्षेचा होतोय बिनधोक लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2022 10:18 PM

नाशिक दुर्घटनेत जखमी झालेले व ठार झालेल्या प्रवाशांपैकी केवळ ३० जणांनाच वाहन विमा कंपनीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित २५ जणांना झालेल्या दुखापती व जीवितहानीची जबाबदारी कुणाची असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आपले आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या परिवहन विभागाने १२ जीवांचा बळी दिला आहे. त्यामुळे या चौकशीत स्थानिक अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथून महानगरात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासावर नागरिकांचा आतापर्यंत विश्वास होता. मात्र नाशिक दुर्घटनेनंतर प्रवासीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिवहन विभाग अक्षरश: सामान्य नागरिकांच्या जिवाचा लिलाव करीत असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. प्रवासी क्षमता ३० असताना  तब्बल ५५ प्रवासी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत असल्याचे उघड झाले आहे. हा अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रकार परिवहन विभागाच्या संमतीनेच सुरू असल्याचे पुढे आले आहे. ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकिटांचा अक्षरश: लिलाव केला जातो. सणासुदीच्या काळात तर मनमानी पद्धतीने तिकिटाचे पैसे वसूल केले जातात. एकीकडे ही मनमानी असताना प्रवासी सुरक्षिततेकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष केले जाते. क्षमतेच्या दुप्पट-तिप्पट प्रवासी कोंबून १० ते १५ तासांचा प्रवास करण्यास भाग पाडले जाते. प्रवासाची पर्यायी साधने नाहीत, ही बाब ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना चांगली ठाऊक आहे. यातूनच प्रवाशांच्या जीविताशी खेळणारे चक्र सुरू झाले आहे. परिवहन विभागाने प्रवासी वाहतुकीची सुरक्षा वारंवार तपासणे आवश्यक आहे. मात्र आजतागायत एकाही ट्रॅव्हल्सला अपवादानेही अतिरिक्त प्रवासी भरल्याबाबतचा मेमो देण्यात आलेला नाही. नाशिक दुर्घटनेत जखमी झालेले व ठार झालेल्या प्रवाशांपैकी केवळ ३० जणांनाच वाहन विमा कंपनीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित २५ जणांना झालेल्या दुखापती व जीवितहानीची जबाबदारी कुणाची असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आपले आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या परिवहन विभागाने १२ जीवांचा बळी दिला आहे. त्यामुळे या चौकशीत स्थानिक अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी. ट्रॅव्हल्स मालकांकडून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू आहे. चालक व वाहकाने रस्त्याने अतिरिक्त प्रवासी भरले, असे बेजबाबदारीचे उत्तर दिले जात आहे. या प्रकरणात फौजदारी संहितेअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, असेही विधिज्ञांकडून सांगितले जात आहे. 

नाशिक अपघातात जिल्ह्यातील मृतांची संख्या झाली तीन - नाशिक येथे झालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातात अज्ञात मृतांची ओळख पटविणे सुरू आहे. शनिवारी अजय कुचनकर (१६) रा. मांगरुळ, ता. मारेगाव याची ओळख पटली होती. रविवारी आलेल्या यादीत पुसद येथील सुरेश लक्ष्मण मुळे या मृताची ओळख पटली आहे. तर यवतमाळ तालुक्यातील वाटखेड येथील हरी तुकाराम भिसनकर (२४) या युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यासाठी त्याच्या पत्नीला बोलविण्यात आले. मात्र तिलाही जळालेला मृतदेह ओळखता आला नाही. आता डीएनए चाचणीद्वारे संशयित मृतदेह हरीचाच आहे काय हे निश्चित केले जाणार आहे. तूर्त तरी शासकीय रेकाॅर्डप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हरी तुकाराम भिसनकर याच्याबाबतची चौकशी सुरू आहे. त्यात तथ्य आढळल्यास त्यालाही मृत जाहीर केले जाईल.

 

टॅग्स :Accidentअपघातfireआग