शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

साहेब, पुनर्गठण नको, कर्जमाफी द्या

By admin | Published: June 04, 2016 2:06 AM

साहेब, कर्ज पुनर्गठण नको, आता केवळ कर्जमाफीच द्या, अशा शब्दात जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा

केंद्रीय पथक जिल्ह्यात : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा, वाळलेल्या बागेची पाहणीयवतमाळ : साहेब, कर्ज पुनर्गठण नको, आता केवळ कर्जमाफीच द्या, अशा शब्दात जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा दिल्लीहून दाखल झालेल्या केंद्रीय पथकापुढे व्यक्त केली. या पथकाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत जिल्ह्यातील दुष्काळाचे दाहक वास्तव जवळून अनुभवले. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य डॉ. रामनंद यादव यांच्या नेतृत्वातील केंद्रीय पथकाने शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली. गुरुवारीच पथक यवतमाळात येणार होते. मात्र एक दिवस उशिराने सदर पथक दाखल झाले. शुक्रवारी सकाळी यवतमाळ तालुक्यातील भारी आणि कळंब तालुक्यातील चापर्डा गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. इतकेच नव्हे तर वाळलेल्या फळ बागांची पाहणी या पथकाने केली. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाही, मिळालेले कर्ज कमी पडते, महागाईत बियाणे आणि खतांची खरेदी अशक्य आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना बियाण्यांचे पॅकेज मिळेल तर लाभदायक राहील, असे सांगितले. पीक विम्याची मदत कर्जात कापल्या जात असल्याचेही अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. या पथकासमोर सिंचन, कालव्याचे अर्धवट काम, कृषी पंपावरील भारनियमन आदी समस्या मांडल्या. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देण्याची मागणी करण्यात आली. या पथकाने चापर्डा येथे एका झाडाखाली सभा घेतली. त्यानंतर अशोक कांबळे आणि सुभाष सरोदे यांच्या वाळलेल्या सत्रा बागेची पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळाचे वास्तव अनुभवून पथकातील सदस्यही अस्वस्थ झाले होते. हा अहवाल पथक केंद्र सरकारला सादर करेल, त्यानंतर मदतीची अपेक्षा आहे. (शहर वार्ताहर)