शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकूण टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
3
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
4
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
5
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
6
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
7
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
8
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
10
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
11
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
12
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
13
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
14
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
15
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
16
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
17
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
18
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
19
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
20
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI

‘एसबीआय’चे १०० ग्राहकसेवा केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 10:01 PM

जिल्ह्यातील सर्वाधिक ग्राहक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे १०० पेक्षा अधिक ग्राहक सेवा केंद्र नव्या आर्थिक वर्षापासून बंद पडले आहेत. त्यामुळे जनधनचे खातेदार, विद्यार्थी, रोहयोचे मजूर आणि पेन्शनर्स मंडळी यांना आपले पैसे काढता येणे कठीण झाले आहे. तर केंद्र चालकांवरही बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देकोडच नाही : जनधनचे खातेदार संकटात, पेन्शनर्सची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सर्वाधिक ग्राहक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे १०० पेक्षा अधिक ग्राहक सेवा केंद्र नव्या आर्थिक वर्षापासून बंद पडले आहेत. त्यामुळे जनधनचे खातेदार, विद्यार्थी, रोहयोचे मजूर आणि पेन्शनर्स मंडळी यांना आपले पैसे काढता येणे कठीण झाले आहे. तर केंद्र चालकांवरही बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची नाळ राष्ट्रीयकृत बँकांशी जोडण्यासाठी हे केंद्र उघडण्यात आले होते. मात्र बँकेच्या मुंबई कॉर्पोरेट कार्यालयाने या केंद्रांचे कोड १ एप्रिलपासून आकस्मिकपणे बंद केले. त्यामुळे ग्राहक सेवा केंद्रातून कोणतेही व्यवहार होणे अशक्य झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका जनधनच्या खातेदारांना बसत आहे. शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांतील छोट्या रकमा, रोहयोच्या मजुरांची मजुरी, निराधारांचे मानधन, पेन्शनर्सचे निवृत्तीवेतन अशा ग्राहकसेवा केंद्रातून विड्राल करणे सोयीचे जाते. स्टेट बँकेच्या व्यवसाय प्रतिनिधींमार्फत ही योजना ग्रामीण भागात पोहोचली. अटल पेन्शन, जीवन ज्योती, सुकन्या व्यक्तिगत अपघात विमा, शिष्यवृत्ती, सामाजिक अर्थसहाय्य आदी योजनांची माहिती ग्राहकांना मिळत असताना गेल्या वर्षभरापासून ही योजना बंद पाडण्याचा घाट घातला जातोय.जनधन खात्यात व्यवहार वाढले असताना बँकेने आॅक्टोबरपासून राज्यातील साडेपाच लाख खाती ‘होल्ड’ केली आहेत. आता १ एप्रिलपासून ग्राहकसेवा केंद्रांचे कोडच बंद करण्यात आल्याने ग्राहकांची मोठी हेळसांड होत आहे. यवतमाळच्या आर्णी रोडवरील केंद्रात रोज ४० ग्राहक येऊन परत जात आहेत.बुधवारी येथे आलेला श्याम तेलेवार हा विद्यार्थी म्हणाला, मी मूळचा किनवटचा माझे खातेही तेथेच आहे. पण आता मी यवतमाळात शिकतोय. माझ्या खात्यात मेसचे ६०० रुपये जमा झाले, ते विड्राल करायचे आहे. माझ्याकडे एटीएम नाही. पण ग्राहकसेवा केंद्र बंद असल्याने आता मला ते पैसे काढता येत नाही. असे अनेक मजूर, पेन्शनर्स या ठिकाणी येऊन परत जात आहेत. याचा मन:स्ताप सहन करावा लागतो.मुंबईत करणार उपोषणमहाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, राज्यस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातील ग्राहक सेवा केंद्रांचेही कोड बंद करण्यात आले आहे. याविरोधात व्यवसाय प्रतिनिधी कल्याणकारी संघटना मुंबईत आंदोलन करणार आहे. येत्या ९ एप्रिल रोजी मुंबईच्या आझाद मैदानात करस्पॉन्डंट वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून उपोषण सुरू करण्यात येणार आहे. या उपोषणात महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तरप्रदेश आदी राज्यातूनही प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.