शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेती पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 9:29 PM

Yawatmal News अतिवृष्टीने विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेतीपिकांना फटका बसला आहे.

ठळक मुद्देनुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठविला प्रस्ताव

अमरावती : जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेतीपिकांना फटका बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानभरपाईचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल चार लाख २२ हजार २९६.३० हेक्टरवर सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांची लागवड केली. पण जुलै महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ४३.५२ टक्के शेतीपिकांचेपूर्णतः नुकसान झाले आहे. याच दोन लाख १७ हजार २५९ हवालदिल शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून शासकीय मदत देण्यासाठी १२२ कोटी ६९ लाख ५८ हजार ८७६ रुपयांच्या निधीची गरज असून, तशी मागणी वर्धा जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत तीन लाख दहा हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची नाेंद आहे. यात ३५ मंडळांचा समावेश आहे. पावसाने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, भाजीपाला पिकाचे नुकसान केले आहे. मूग आणि उडीद हे दोन्ही पिके अतिपावसाने हातातून गेली आहेत. पिकाचे उत्पन्न ५० टक्क्यांपेक्षा अधिक कमी होण्याचा धोका वर्तविला जात आहे.

अमरावती जिल्ह्यात २.७० लाख हेक्टर बाधित झाले असून, जुलै महिन्यात ५६ महसुलात अतिवृष्टी झाली. त्यामुळे २,५०,२६९ शेतकऱ्यांच्या २,७०,९१० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. या आपत्तीमुळे जिरायती क्षेत्रात २,११,३४५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन ९०,५१७.७५ हेक्टर, कपाशी ७५,४५२.३४, तूर ३१,००३, मूग १३.५२, उडीद ३.३६, तीळ ७, मका ३,६९०.२२, ज्वारी २,८९५.६४, मिरची १३५.२५ व इतर पिकांचे १,०७० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :floodपूरagricultureशेती