शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चुरमुरा येथे तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:42 IST

गावकुसाबाहेरील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्याने चुरमुरा येथील गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गावकुसाबाहेरील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्याने चुरमुरा येथील गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.गावाच्या चारही बाजूंनी घनदाट जंगल आहे. सीताफळांचा बगीचा म्हणून या परिसराची ओळख आहे. तेंदूपत्ता संकलन, शेतीसह पशूपालन असे पूरक व्यसाय करून ग्रामस्थ उदरनिवार्ह करतात. वर्षांपूर्वी या परिसराची सुजलाम, सुफलाम म्हणून ओळख होती. मात्र आता त्याच चुरमुरा गावाचे वैभव शासन व लोकप्रतिनीधींच्या नाकर्तेपणामुळे संपुष्टात आले आहे.जंगलात बेसुमार वृक्षतोड झाल्यामुळे सभोवतालच्या विहिरी, बोअर, हातपंप हे पाण्याचे संपूर्ण स्रोतच आटले आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात महिला, पुरुष, बालकांना हंडाभर पाण्यासाठी तास न् तास भटकंती करावी लागत आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत. २०१७ मध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत गावकºयांनी सहभाग घेतला होता.येथील काही सामाजिक संघटनांनी गावकऱ्यांना प्रोत्साहित करून सलग समतल चर, लूज बोल्ड स्ट्रक्चर बंधारे, सिमेंट बांध, माती नाला बांध, शेततळे, दगडी बांध आदी कामे केली होती. त्यामुळे चुरमुरा गावाने तालुक्यातून तिसरा क्रमांक मिळविला होता. गावाला पाच लाखांचे बक्षीस मिळाले होते. मात्र बक्षिसाची रक्कम गावातील तीव्र पाणी टंचाईचा कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी वापर करण्यास गावातील लोकप्रतीनिधी उदासीन आहे. परिणामी गावकºयांची पिण्याच्या पाण्यावाचून दैना होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई