शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

उमरखेडमध्ये सिग्नल ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:28 AM

उमरखेड : येथील संजय गांधी चौकामधील सिग्नल बंद आहे. वाहनधारकांना अपघातापासून वाचविणे हे, सिग्नलचे काम आहे. खांबाला काही दिवसांपूर्वी ...

उमरखेड : येथील संजय गांधी चौकामधील सिग्नल बंद आहे. वाहनधारकांना अपघातापासून वाचविणे हे, सिग्नलचे काम आहे. खांबाला काही दिवसांपूर्वी कंटेनरने धडक दिल्याने खांब खिळखिळा झाला आहे. आता या खांबामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

शहरातील मुख्य चौक असलेल्या संजय गांधी चौकात अनेक वर्षांपासून सिग्नल लावण्याची मागणी होती. दोन वर्षांपूर्वी भारती मैंद सहकारी पतसंस्थेच्या सौजन्याने सिग्नल लागले. मात्र, सहा-आठ महिन्यातच सिग्नल बंद पडले. काही दिवसांपूर्वी कंटेनरने सिग्नलच्या खांबाला धडक दिली. परिणामी खांब बुडातून खिळखिळा होऊन रस्त्याच्या बाजूला झुकला. हा खांब कधीही पडूून अपघात होण्याची शक्यता आहे.

याबाबत काही संघटनांनी वाहतूक शाखेला अनेकदा कळविले. परंतु वाहतूक शाखेने अद्याप कोणतीही तसदी घेतली नाही. त्यामुळे वाहतूक शाखा एखाद्या अपघाताची वाट पाहते आहे की काय, असा प्रश्न वाहनधारक विचारत आहे. वाहतूक शाखेने अपघातास कारणीभूत ठरू पाहणाऱ्या सिग्नलच्या खांबाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.