शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
3
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
4
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
5
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
6
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
7
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
8
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

सहा गट, १२ गणांचे आरक्षण बदलणार

By admin | Published: January 26, 2017 12:51 AM

जिल्हा परिषदेच्या विडूळ-चातारी गटाच्या सामान्य महिला आरक्षणाला नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

आयोगाचे आदेश : जि.प., पं.स.ची संंबंधित निवडणूक लांबणार यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या विडूळ-चातारी गटाच्या सामान्य महिला आरक्षणाला नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेचे सहा गट व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या १२ गणांचे आरक्षण बदलण्याचे आदेश दिले. यामुळे या गट व गणांची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. आयोगाने मारेगाव तालुक्यातीाल कुंभा-मार्डी, वणी तालुक्यातील घोन्सा-कायर, नेर तालुक्यातील वटफळी-अडगाव, दारव्हा तालुक्यातील लाडखेड-वडगाव गाढवे आणि उमरखेड तालुक्यातील विडूळ-चातारी या सहा गटांसह, त्या अंतर्गत येणाऱ्या १२ पंचायत समिती गणांचे आरक्षण बदलण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाने २३ जानेवारीला ६८५२/२०१६ व ६६१५/२०१६ या दोन याचिकांवर एकत्रित आदेश पारित करताना जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करताना झालेली चूक दुरूस्त करण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगाला दिली. त्यानुसार हे आरक्षण बदलविण्यात येणार आहे. तथापि प्रथम जिल्हा निवडणूक विभागाने आरक्षण निश्चिती योग्यच असल्याचा दावा केला होता. नंतर चूक झाल्याचे मान्य केले होते. राज्य निवडणूक आयोग्याच्या निर्देशामुळे त्यांचा पहिला दावा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने हे सहा गट व १२ गण वगळून निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या सहा गट व १२ गणांची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. या सहा गट व १२ गणांसाठी आता २६ जानेवारीला आरक्षणात बदलाची सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. २७ जानेवारीला त्यावर हरकती व सूचना सादर करता येईल. ३० जानेवारीला प्राप्त हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त सुनावणी घेऊन निर्णय देतील. लगेच आरक्षणात बदल करण्यात येत असल्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. यात हरकती व सूचना सादर करण्यासाठी २८ जानेवारीला सुटीच्या दिवशीही निवडणूक विभागाचे काम सुरू ठेवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहे. (शहर प्रतिनिधी) निवडणूक विभागाचा दावा फोल विडूळ-चातारी गटाचे काढलेले आरक्षण योग्यच असल्याचा दावा बुधवारी सायंकाळपर्यंत निवडणूक विभागाने केला होता. परंतु आयोगाने एक नव्हे तर तब्बल सहा गट व १२ गणांचे आरक्षण नव्याने काढण्याचे आदेश दिल्याने निवडणूक विभागाचा हा दावा फोल ठरला. न्यायालयाने केवळ विडूळ-चातारी गटात याचिकाकर्त्याचे समाधान करण्याच्या सूचना केल्या असताना प्रशासनाने अन्य पाच गटांंना नख लावण्यामागील कारण अस्पष्ट आहे. पुन्हा कोर्ट-कचेरीची चिन्हे विडूळ-चातारीचे वादग्रस्त आरक्षण उच्च न्यायालयापर्यंत गेल्याने त्याच नव्हे तर अन्य पाच गटांमध्ये फेरबदल झाले. त्यामुळे तेथील इच्छुकांचे गणित बिघडले. हे नाराज इच्छुक आमच्या पाच गटांमध्ये फेरबदल का ? असा प्रश्न उपस्थित करीत पुन्हा कोर्ट-कचेरी करण्याच्या तयारीत आहे. त्यात आर्णी तालुक्यातील देऊरवाडी-सुकळी सर्कलमधील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराची आघाडी आहे.